spot_img
महाराष्ट्रअजित पवारांचं कुटुंबाबत मोठं विधान; आता पवार घराण्यातील कटुता...

अजित पवारांचं कुटुंबाबत मोठं विधान; आता पवार घराण्यातील कटुता…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
अजित पवार आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखले जातात. आज त्यांनी आपल्या घराण्याबाबत एक मोठं वक्तव्य केले आहे. राजकारणामुळे पवार घराण्यात निर्माण झालेली कटुता दूर होईल, असे मला वाटत नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

काय म्हणाले अजित पवार?
राजकारणामुळे पवार घराण्यात निर्माण झालेली कटुता दूर होईल, असे मला वाटत नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. हे वक्तव्य करुन अजित पवार यांनी एकप्रकारे आगामी काळात शरद पवार यांच्याशी पुन्हा जुळवून घेणे शक्य नसल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र येतील का? हे येणाऱ्या काळात आपल्याला समजेल.

सुप्रिया सुळेंबाबत अजित पवार काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आपण शरद पवार यांच्याशी संपर्कात नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले. जास्त कधी संबंध आला नाही. मी माझ्या कामात व्यस्त असतो, ते त्यांच्या कामात व्यस्त असतात. सुप्रिया सुळे यांच्याशी मी एक-दोन वेळा फोनवर बोललो आहे असे अजित पवार म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसामुळे नुकसान झालेल्या केडगाव अमरधाम, आंबेडकर भवनाची आयुक्तांकडून पाहणी

पडलेल्या भिंती बांधण्याचे काम तत्काळ सुरू करा : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे अहिल्यानगर ।...

मनपा, झेडपी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले!, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेकडून जोर बैठका..

सुनील चोभे | नगर सह्याद्री आगामी दोन-तीन महिन्यांत होऊ घातलेल्या महापालिका, नगर पंचायती, नगर परिषदा,...

ठाकरे ब्रँड बुडाला! आदित्य ठाकरेंचा पावसाळा आता कारागृहात?; मंत्री नितेश राणेंचे खळबळजनक वक्तव्य…

Politics News: राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून...

शहरासह जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी; शांतता व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरासह जिल्ह्यात मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद (ईद उल अजहा) शनिवारी...