spot_img
ब्रेकिंगअजित पवार मुख्यमंत्री होतील; मंत्र्याच्या वक्तव्यानं महायुतीत खळबळ

अजित पवार मुख्यमंत्री होतील; मंत्र्याच्या वक्तव्यानं महायुतीत खळबळ

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे आणि भविष्यात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असं विधान सरकारमधील मंत्री बाबासाहेब मोहनराव पाटील यांनी केले आहे. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रशासनावर असलेली मजबूत पकड आणि राज्याच्या विकासासाठी असलेल्या त्यांच्या दृष्टिकोनचे कौतुक देखील केले. मात्र, हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

पक्षप्रमुख अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता असून भविष्यात तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असं मत बाबासाहेब पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केलं. पुढं ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील चांगलं काम करतायत. परंतु, भविष्यात निवडणुकीनंतर अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, हे फक्त माझं वैयक्तिक मत आहे. माझा कोणालाही विरोध करत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

अजित पवार सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. पवार यांच्याकडे वित्त मंत्रालयाचा कार्यभार देखील आहे. 11 मार्च रोजी अजित पवार यांनी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना, अजित पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना योजनेसाठी एकूण 36,000 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे आणि या योजनेअंतर्गत 2 कोटी 53 लाख लाभार्थी महिलांना आर्थिक लाभ दिला जात आहे, असे त्यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...