spot_img
ब्रेकिंगअजित पवार गटाच्या नेत्याला बेडया; आंधारातल घोटाळा प्रकरण उजेडात..

अजित पवार गटाच्या नेत्याला बेडया; आंधारातल घोटाळा प्रकरण उजेडात..

spot_img

Maharashtra News: राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. एकीकडे नेते मंडळी निवडणुकीच्या कामकाजात व्यस्त आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याला अटक करण्यात आली आहे. बाजार समितीतील घोटाळा प्रकरणी १५ दिवसांपूर्वी त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अधिक माहिती अशी: बीडच्या पाटोदा बाजार समितीच्या मालकीचा भूखंड, बेकायदेशीर रित्या दुसऱ्याच व्यक्तीच्या नावे केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते रामकृष्ण बांगर यांना वाशिम येथून अटक करण्यात आली आहे. १५ दिवसांपूर्वी पाटोदा पोलिस ठाण्यात रामकृष्ण बांगर यांच्याविरोधात या गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलिस त्यांच्या शोधात होते. अखेर त्यांना पोलिसांना अटक केली.

रामकृष्ण बांगर यांच्यावर बाजार समितीच्या भूखंड प्रकरणाबरोबरच महात्मा फुले अर्बन बँकेच्या माध्यमातून १४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. रामकृष्ण बांगर यांच्यासह तब्बल ४१ जणांवर हा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून रामकृष्ण बांगर हे फरार होते. त्यांच्या मागावर असलेल्या पथकाने वाशीम येथील एका हॉटेलमधून त्यांना अटक केली असून चौकशी सुरु आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाहेर, पण कोट्यवधी कमावले! गुजरात टायटन्सलाही लागली लॉटरी

नगर सह्याद्री वेब टीम मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये क्वालिफायर २ मधून...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत मोठी अपडेट; निवडणूक आयोगाकडून सरकारला….

राज्य निवडणूक आयोगाच्या प्रभाग रचनेबाबत सुचना मुंबई | नगर सह्याद्री राज्यातील रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद,...

अहिल्यानगर जिल्हा गोळीबाराने हादरला; भीमराज आव्हाडांसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना आणि हिंसाचाराच्या घटना घडत...

नगर शहर हादरलं! युवकांवर गोळीबार; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना आणि हिंसाचाराच्या घटना घडत...