spot_img
महाराष्ट्रअजित पवारांचं ठरलं; किती जागांवर केला दावा पहा...

अजित पवारांचं ठरलं; किती जागांवर केला दावा पहा…

spot_img

विद्यमान आमदारांनाच तिकीट | ७० हून अधिक जागांवर दावा

मुंबई | नगर सह्याद्री
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ७० पेक्षा जास्त जागांवर दावा केला जाणार आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची एक बैठक पार पडली त्यातून ही माहिती समोर आली आहे. विद्यमान आमदारांपैकी कोणाचेही तिकीट कापले जाणार नसल्याची हमीही अजित पवारांनी दिली असल्याची माहिती आहे. या बैठकीत जागावाटपावर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.
२०१९ साली राष्ट्रवादीचे ५४ आमदार निवडून आले होते. त्यात आणखी १५ जागांची मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून केली जाणार आहे. विद्यमान आमदारांपैकी कोणाचेही तिकीट कापले जाणार नाही अशी बैठकीत हमी देण्यात आली.

आमदारांसोबत झालेल्या बैठकीत फक्त १५ जागा वाढवून मागण्यांची रणनीती आखण्यात आली आहे. त्यामुळे आता ७० पेक्षा जास्त जागांवर दावा करण्यात येणार आहे. या आधी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून राज्यातील ८० जागांवर दावा करण्याची तयारी होती. दरम्यान, आधीपासूनच महायुतीत भाजप मोठा भाऊ असल्याचे स्पष्ट आहे. त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि नंतर राष्ट्रवादीचा नंबर लागतो. अजित पवार गटाने ७० जागांवर दावा करत असले तरी काही ठिकाणी एकाच जागेवर दोन पक्षांचा दावा होऊ शकतो. त्यावर महायुतीतील नेते कसा निर्णय घेतील हे आगामी काळात पाहणे महत्वाचे आहे.

अजित पवारांना धक्का
राज्यात लवकरच विधानसभा निवडणुक लागणार आहे. या निवडणुकांसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचे समर्थक आणि ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे यांनी शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. ईश्वर बाळबुद्धे यांनी घरवापसी करणार असल्याने अजित पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. छगन भुजबळ यांचे समर्थक आणि ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थित घरवापसी करणार असल्याची चर्चा आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...