पारनेर। नगर सहयाद्री
जी.एस.महानगर बँकेच्या सभासदांनी मोठ्या मताधिक्याने तुम्हाला निवडुन दिले आहे. या पाठबळामुळे संचालक मंडळाला बँकेची प्रगती साधण्यासाठी नवे दायित्व प्राप्त झाले आहे. बँकेच्या प्रगतीत वाढ करत एकजुटीने ‘महानगर’ बँकेला नव्या उंचीवर न्या असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी केले आहे.
मुंबई येथील देवगिरी निवासस्थानी जी.एस महानगर बँक निवडणूकीतील साॅलिसिटर गुलाबराव शेळके संस्थापक पॅनल प्रमुख गीतांजली शेळके व नवनिर्वाचित संचालकांनी उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक भास्कर खोसे, संचालक भास्करराव कवाद, सचिन अडसुळ, रविंद्र ढोले, बबनराव लंके, गणेश गुंजाळ, सतिश खणकर, कुंदा खोसे, मंगेश खोसे,श्रीधर कोठावळे,संतोष रणदिवे,भिवाजी थोरात,संतोष पठारे,शंकर शिंदे,पांडुरंग शिंदे,मंगलदास थोरात,छाया वाढवणे,विलास पालवे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष स्व.गुलाबराव शेळके आणि माजी अध्यक्ष स्व.ॲड.उदय शेळके यांनी बँकेत राखलेली आर्थिक शिस्त कायम ठेवा बदलत्या काळानुसार नवीन पिढीच्या आधुनिक गरजा लक्षात घेऊन, बँकेने सुशिक्षित आणि कुशल कर्मचारी वर्गाची भरती करुन बँकेची कार्यक्षमता वाढवा आणि ग्राहकांना अधिक चांगली सेवा द्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीमुळे संचालक मंडळाला नवचैतन्य आणि उत्साह मिळाला असून आम्ही आता अधिक जोमाने काम करत सॉलिसिटर स्व.गुलाबराव शेळके,स्व.उदयदादा यांच्या विचारधारेवर आधारित नेतृत्वात बँकेची घोडदौड निश्चितच पुढे नेऊ,अशी ग्वाही यावेळी संचालक मंडळाच्यावतीने गीतांजली शेळके यांनी दिली.