spot_img
अहमदनगरAhmednagar News : 'येथे' शेकडो झाडांची बेकायदेशीर कत्तल, 'त्या' कारखान्यासाठी ठेकेदाराचा मोठा...

Ahmednagar News : ‘येथे’ शेकडो झाडांची बेकायदेशीर कत्तल, ‘त्या’ कारखान्यासाठी ठेकेदाराचा मोठा प्रताप

spot_img

पारनेर / नगर सह्याद्री : अहमदनगर-कल्याण महामार्गावरील भाळवणी व माळकूप शिवारातील रस्त्याच्या बाजूची जवळपास २०० झाडांची बेकायदेशीर कत्तल करण्यात आली. एका खासगी कारखान्यास वीजपुरवठा व वितरण करण्यासाठी हा प्रताप ठेकेदाराने केला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत माळकूप ग्रामस्थांनी गुरुवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे यासंबंधी लेखी तक्रार केली आहे.

महावितरण कंपनीचे माळकूप येथील खासगी साखर कारखान्यासाठी ३३ के.व्ही.च्या उच्च दाब वाहिनीसाठी रस्त्याच्या कडेने वाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. या कामासाठी खासगी ठेकेदाराकडून ही झाडे कत्तल केली जात आहेत. ग्रामस्थांनी गुरुवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे यासंबंधी लेखी तक्रार केली.

पारनेर मधील वनविभागाने नगर कल्याण महामार्गावरील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या ५३ झाडे तोडण्याची लेखी परवानगी ४ डिसेंबर रोजी श्रीरामपूर येथील साई एजन्सीला दिली आहे. परंतु नियम पायदळी तुडवून शेकडो झाडांची कत्तल या ठेकेदाराने केली असल्याचा आरोप भाळवणी व माळकूप ग्रामस्थांनी केला आहे. शेकडो झाडांची कत्तल करणाऱ्या सबंधित एजन्सीवर, ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

परवानगी ५३ झाडांची, कत्तल शेकडो झाडांची
महावितरण कंपनीने ३३ केव्हीचा उच्च दाब वाहिनीसाठी पारनेरच्या वनविभागाच्या पंचनाम्याप्रमाणे ५३ झाडांची परवानगी कंपनीसाठी दिली. परंतु या ठेकेदाराने सरसकट शेकडो झाडांची कत्तल केली आहे. यासंबंधी माळकूप ग्रामपंचायत सरपंच संजय काळे यांनी लेखी ठराव केला आहे. भाळवणी व माळकूप येथील वड-५, बाभूळ-१७, लिंब-४, निलगिरी-२३, काशिद-४ अशा एकूण ५३ झाडांची परवानगी दिली असताना शेकडो झाडांची कत्तल करण्यात आल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...