spot_img
अहमदनगरAhmednagar News : शेतकऱ्यांचे पीक कर्ज शासनाने भरावे, आ. लंके यांनी लक्षवेधीमध्ये...

Ahmednagar News : शेतकऱ्यांचे पीक कर्ज शासनाने भरावे, आ. लंके यांनी लक्षवेधीमध्ये केल्या ‘या’ मागण्या

spot_img

पारनेर /नगर सह्याद्री :
पारनेर व नगर तालुक्यातील ४९ गावातील शेतकऱ्यांना १५ दिवस उलटूनही एक रुपयाची मदत सरकारच्या वतीने दिली नसल्याची लक्षवेधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी विधानसभेत मांडली.

त्यामुळे पारनेर व नगर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, राज्यातील अनेक भागात गारपिटीने, अवकाळीने मोठे नुकसान झाले असून त्यांनाही मदत द्यावी अशी मागणी आ. लंके यांनी केली. तसेच आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांचे पीककर्ज शासनाने भरावे अशी मागणीही त्यांनी केली.

सन २०२३-२४ च्या पुरवणी मागण्यासंदर्भात लक्षवेधी मध्ये आमदार निलेश लंके म्हणाले की राज्यामध्ये २५ ते २७ नोव्हेंबर मध्ये मोठ्या प्रमाणावर अवकाळी व गारपीट झाली. पारनेर व नगर तालुक्यातील जवळपास ४९ गावे बाधित झालेले आहे. या गारपिटीमुळे कांदा, केळी, पपई, द्राक्ष, मोसंबी, संत्री, गहू, हरभरा, मका आदींसह रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

त्यामुळे या ४९ गावातील बळीराजा अक्षरशः उध्वस्त झाला आहे. या ४९ गावातील बाधित शेतकऱ्यांची संख्या १० हजार ४५२ असून या गारपिटीने अवकाळी सहा हजार पाचशे हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे. त्यामुळे या बाधित क्षेत्रांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी आमदार नीलेश लंके यांनी लक्षवेधी दरम्यान केली आहे.

महसूलमध्ये कर्मचाऱ्यांची तातडीने भरती करावी
महसूल विभागातील कर्मचारी संख्येंकडे त्यांनी लक्ष वेधले. एका कामगार तलाठ्याकडे चार ते पाच गावांचा पदभार आहे. त्यांना काम करण्यात मोठी अडचण येत आहे. त्यामुळे या रिक्त जागांवर कर्मचाऱ्यांची भरती करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आ. लंके यांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘राज्यमंत्री मंडळाची बैठक ‘या’ तारखेला अहिल्यानगरमध्ये भरणार’; जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मांडले जाणार?

जामखेड । नगर सहयाद्री:- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती मे महिन्याच्या अखेरीस...

पूजा खेडकर प्रकरणात मोठा निर्णय; सुप्रिम कोर्टात काय घडलं?, वाचा एका क्लिकवर..  

IAS Pooja Khedkar News: UPSC नागरी सेवा परीक्षा 2022 मध्ये ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा...

तुमच्या घरावर भानामती? कुटुंबावर संकट! दोन महिलांनी रचला डाव; ३३ लाखाची ‘अशी’ केली फसवणूक

Maharashtra Crime News: आजही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला जात आहे. यातून फसवणूक झाल्याचे देखील समोर...

नागरिकाभिमुख कारभारासाठी महानगरपालिका कटीबद्ध; आयुक्त यशवंत डांगे

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेने गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासकीय कामकाजासाठी ई ऑफीस प्रणालीचा वापर सुरू...