spot_img
अहमदनगरAhmednagar Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर विहिरीत टाकले! बेपत्ता तरुणांसोबत काय-काय घडले..?...

Ahmednagar Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर विहिरीत टाकले! बेपत्ता तरुणांसोबत काय-काय घडले..? एक संशयितास ताब्यात

spot_img

राहुरी । नगर सहयाद्री
तालुक्यातील शिलेगाव येथे विजय जाधव या आरडगाव येथील तरुणाची हातपाय बांधून मुळा नदीपात्रात असलेल्या एका विहिरीत टाकून त्याची हत्या करण्यात आली. ही घटना काल दि. १५ मे रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.

मंगळवार दि. १४ मे रोजी आरडगाव येथील विजय आण्णासाहेब जाधव या तरूणाच्या नातेवाईकांना शिलेगाव येथे विजय यास मारहाण झाल्याचे समजले. त्यानंतर नातेवाईकांनी शिलेगाव येथे जाऊन विजय याचा शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. विजय यास मारहाण करणाऱ्यांच्या घरी गेले असता त्यांना तेथे मारहाण करणारे सुध्दा सापडले नसल्याने नातेवाईकांच्या चिंतेत भर पडली.

काल सकाळी विजयच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात विजयची मिसींग तक्रार दाखल केली. त्यानंतर विजय यास मारहाण करणारा शिलेगाव येथील एक तरुण करपरानदीच्या काटबनात लपून बसल्याची माहिती विजयच्या नातेवाईकांना समजली.त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी सुरवातीला विचारपूस केली त्यांने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने विजयचा मृतदेह शिलेगाव येथील मुळानदी पात्रातील विहिरीत असल्याची कबुली दिली. या घटनेतील इतर आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. विजय जाधव याचा खून कोणत्या कारणातून व कोणी केला, हे अद्याप समजू शकलेले नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...