spot_img
अहमदनगरAhmednagar : महापालिकेविरोधात व्यावसायिक आक्रमक, शुल्क आकारणीस विरोध

Ahmednagar : महापालिकेविरोधात व्यावसायिक आक्रमक, शुल्क आकारणीस विरोध

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री :
नगर शहरातील सर्व प्रकारच्या व्यावसायिक आस्थापना, दुकानांना व्यवसाय परवाना शुल्क आकारण्यात येणार आहे. विविध प्रकारच्या आस्थापनांना (सर्व प्रकारचे दुकाने) २०० रुपये ते १५ हजार रुपयांपर्यंत वार्षिक शुल्काचा दर प्रस्तावित केला असून महापालिका लवकरच त्याची अंमलबजावणी करणार आहे.

या प्रस्तावास शहरातील व्यापारी, व्यावसायिक, दुकानदारांनी हरकत घेतली आहे. हा कर पूर्णत: जाचक असून व्यापार्‍यांना अधिक त्रास देणारा आहे. शहरातील सर्व व्यापारी, आस्थापनांनी एकजूटीने यास विरोध करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुभाष मुथा यांनी केले आहे.

शहरात सुमारे ३० ते ४० हजार आस्थापना असून, परवाना शुल्क आकारणीमधून सुमारे दोन कोटी रुपये उत्पन्न मिळेल, अशी मनपाला अपेक्षा आहे. हे धोरण अतिशय चुकीचे आणि अवास्तव आहे. येत्या १५ दिवसात त्याची अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

तसा प्रस्ताव आयुक्तांकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. त्यास आयुक्तांनी मंजूरी देऊ नये. मनपाकडे उत्पन्नासाठी अन्य स्त्रोत शोधावेत. पूर्वी शॉपअ‍ॅट अंतर्गत अनेक जाचक तरतुदी होत्या. दंडात्मक कारवाई करणे, कोर्टात केस करणे, इन्स्पेटर राज होते. त्याला व्यापार्‍यांनी विरोध केल्यावर राज्य शासनाने तो कायदा रद्द केला. आता नगर महापालिका शिळ्या कढीला ऊत या प्रमाणे हा निर्णय लादण्याचा प्रयत्न करीत आहे.

व्यापार्‍यांनी जागे होऊन आपली ताकद दाखवणे आवश्यक आहे. व्यापारी, व्यावसायिक आधीच जीएसटीची किचकट प्रक्रिया, इतर सरकारी कर प्रक्रियेमुळे हैराण आहेत. आता महापालिका वर्षाला परवाना शुल्काच्या नावाने वसुली करणार आहे. वास्तविक पाहता महापालिका हद्दीतील व्यापारी मनपाचे इतर सर्व कर भरत असतात.

त्या मानाने सुविधांचा अभाव आहे. नागरिकांना चांगल्या सुविधा पुरवता येईल, याकडे मनपाने लक्ष दिले पाहिजे. आणखी कराचा बोजा टाकून शहरातील व्यापार, व्यवसायाला अडचणीत आणण्याचे काम करू नये. स्थायी समिती, महासभेने व्यापार्‍यांच्या भावना लक्षात घेऊन या विषयाला मंजुरी द्यायला नको होती.

असे असले तरी आता शहरातील सर्व व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक एकजुटीने या प्रस्तावाला विरोध करणार आहेत. त्यासाठी शनिवारी (दि. २५) दुपारी ४.३० वाजता कापडबाजार जैन मंदिर येथे व्यापार्‍यांची व्यापक बैठक घेऊन आक्रमक आंदोलनाचा निर्णय घेणार असल्याचे सुभाष मुथा यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...