spot_img
अहमदनगरअहिल्यानगर: वेटरने घेतला हॉटेलमध्ये गळफास; कारण आलं समोर..

अहिल्यानगर: वेटरने घेतला हॉटेलमध्ये गळफास; कारण आलं समोर..

spot_img

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:-
पती-पत्नीचा किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर पत्नी रागाच्या भरात घरातून बाहेर निघून गेल्याने निराश झालेल्या पतीने ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 16 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास राहुरी तालुक्यातील गुहा येथे उघडकीस आली. गणेश शिवाजी अदमाने (वय 34) रा. ऊरुली देवाची, ता. हवेली, पुणे, असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. गणेश अदमाने हा गेल्या काही दिवसांपासून राहुरी तालुक्यातील गुहा परिसरात असलेल्या साई सुंदर हॉटेल येथे वेटर म्हणून काम करत होता.

तसेच तो त्याची पत्नी व मुलांसह हॉटेल मागील एका खोलीत राहत होता. रात्रीच्या दरम्यान गणेश अदमाने याचे किरकोळ कारणावरून पत्नीशी वाद झाले होते. त्यानंतर रागाच्या भरात पत्नी घरातून बाहेर निघून गेली. तेव्हा गणेश अदमाने यांनी हॉटेल मागील पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना 16 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रवीण बागुल यांनी घटनास्थळी धाव घेतली.

गणेश अदमाने यास रुग्णवाहिकेतून राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले. मयत गणेश अदमाने यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास राहुरी पोलीस पथकाकडून सुरू आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डाळिंब तोडणाऱ्या महिलेवर बिबट्याचा हल्ला; कुठे घडली घटना?

संगमनेर । नगर सहयाद्री:- शेतातील बागेत डाळिंब तोडणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. ही घटना...

आजचे राशी भविष्य! चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य पुन्हा ऊर्जा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. जर तुमची...

मंत्री विखे शेतकऱ्यांच्या बांधावर; अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी, दिले महत्वाचे आदेश..

पाथर्डी | नगर सह्याद्री सोमवारी अहमदनगर शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अनेक भागात अतिवृष्टी...

आयत्या पिठावर रेघोट्या मारून, खोटे सांगून क्रेडिट का घेता?; माजी मंत्री थोरात यांचा विरोधकांना सवाल

संगमनेर | नगर सह्याद्री दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता सहकारमहष भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या...