spot_img
अहमदनगरकृषीमंत्री दत्तात्रय भरणे शेतकऱ्यांच्या बांधांवर; अहिल्यानगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे शेतकऱ्यांच्या बांधांवर; अहिल्यानगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
गेल्या आठ दिवसांत दोनदा झालेल्या अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, याची दखल घेत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी 24 सप्टेंबर रोजी जिल्ह्याचा दौरा करत शेवगाव व पाथड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची शेतीच्या बांधांवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्यासोबत आ. संग्राम जगताप, आ. मोनिका राजळे देखील उपस्थित होत्या.

त्यांनी भागातील नुकसानीची माहिती कृषीमंत्र्यांसमोर मांडली. जिल्ह्यात गेल्या आठवड्यात दोन वेळा झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन, कपाशी, मका, आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या प्राथमिक पाहणीनुसार, 2 लाख 30 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कृषीमंत्री भरणे यांनी बुधवारी पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष भेटी दिल्या, शेतीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.

त्यांनी अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे पूर्ण करून मदतीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या. शेवगाव, पाथड, नगर, नेवासा आणि अकोले तालुक्यांमध्ये दोन वेळा झालेल्या जोरदार पावसामुळे शेतातील उभे पीके वाया गेले आहे. काही भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे अनेकांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जैन मंदिर: काळे यांचे पुण्यात धरणे आंदोलन; ताबा न सोडल्यास प्राणांतिक उपोषण करणार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगरमध्ये श्री ऋषभ संभव जीन जैन श्वेतांबर संघ (जैन मंदिर) ट्रस्टचा...

बदनामी केली..; किरण काळे यांच्यावर कारवाई करा; पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना कोणी दिले निवेदन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघाच्या कापड बाजार अहिल्यानगरच्या...

आघाडी, युतीचे चित्र धुसर…; स्थानिक आघाड्यांना प्राधान्य

नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी राजकारण तापले | वरिष्ठांकडून आदेश मिळेना अहिल्यानगर | नगर सहयाद्री:- अहिल्यानगर...

बोगस दस्त नोंदवून फसवणूक प्रकरण; अंजुम शेख, डावखर, इंगळेंसह सात जणांविरुध्द गुन्हा दाखल

श्रीरामपूर | नगर सह्याद्री वारसा हक्कातील जमिनीच्या वादातून श्रीरामपुरात कोट्यवधी रुपयांचा बोगस दस्त नोंदवून, फसवणूक...