spot_img
अहमदनगर27 केंद्रांना कृषी विभागाचा दणका; किती परवाने केले निलंबित?

27 केंद्रांना कृषी विभागाचा दणका; किती परवाने केले निलंबित?

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
खरीप हंगाम 2025 अनुषंगाने कृषी विभागाने जिल्हाभरात कृषी सेवा केंद्रांची व्यापक तपासणी मोहिम राबवली असून या मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आल्या आहेत. नियमबाह्य कामकाज करणाऱ्या केंद्रांवर कारवाई करत राहुरी तालुक्यातील 2 आणि नेवासा तालुक्यातील 1 असे 3 परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

कृषी विभागाच्या तपासणीत विविध त्रुटी उघड झाल्या असून त्यामध्ये भाव फलक व साठा फलक नसणे, विक्री परवाना दुकानदाराने दर्शनी भागात न लावणे, साठा पुस्तके अद्ययावत नसणे, स्रोत परवान्यात नमूद नसणे, ग्राहकांना पावत्या न देणे, विक्री अहवाल दर महिन्याला सादर न करणे, टोल फ्री क्रमांक उपलब्ध नसणे आणि खतांची विक्री पॉस मशिनवरून न करणे अशा गंभीर त्रुटींचा समावेश आहे. तपासणीनंतर दोषी ठरलेल्या केंद्रांना नोटीस देऊन सुनावणीही घेण्यात आली. या सुनावणीदरम्यान दोष सिद्ध झाल्यानंतर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात आली आहे.

विक्री परवाने घेतले असतानाही दुकाने बंद ठेवणाऱ्या केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. या अंतर्गत राहुरी तालुक्यात 4, अकोले 6, नेवासा 5, शेवगाव 3, नगर 3 आणि पाथड 3 अशा 24 विक्री केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, खरीप हंगामात शेतकऱ्यांना योग्य वेळी आणि नियमानुसार सेवा मिळाव्यात, यासाठी ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. यापुढील काळातही अशाच प्रकारची नियमित तपासणी सुरू राहणार असून, नियमभंग करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी स्पष्ट केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खरे असणारे दीड किलो सोने बनावट कसे झाले?: बाबासाहेब तांबे

गोरेश्वर पतसंस्था बाजीराव पानमंद व कुटुंबाने खासगी प्रॉपट असल्यागत चालवल्यानेच ही संस्था अडचणीत आली! पारनेर...

शिवसेना-मनसे युतीबाबाबत उद्धव ठाकरेंचं सूचक विधान; आता थेट…

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे...

मनपा, झेडपीसाठी शिंदे सेना सज्ज; शनिवारी नगरमध्ये मेळावा

संपर्कमंत्री शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती अहिल्यानगर | नगर सह्याद्री आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदे...

एक पाऊल पुढे या, राज ठाकरे 100 पावलं पुढे येतील; युतीसाठी मनसेची भूमिका जाहीर

मुंबई | नगर सह्याद्री राज्यात नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वेगळं...