spot_img
ब्रेकिंग'शिर्डीत लक्झरी लूट प्रकरण' नऊ वर्षानंतर आरोपी 'असा' अडकला जाळ्यात

‘शिर्डीत लक्झरी लूट प्रकरण’ नऊ वर्षानंतर आरोपी ‘असा’ अडकला जाळ्यात

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
नगरमधून गुजरातकडे जाणार्‍या
लक्झरी बसमधील प्रवाशाला शिर्डीमध्ये लुटण्याचा प्रकार २०१५ मध्ये घडला होता. या प्रकरणातील मच्छिंद्र पोपट कांडेकर (रा. केडगांव) हा नऊ वर्षांपासून फरार होता. त्याला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.

अधिक माहिती अशी : २८ एप्रिल २०१५ रोजी घटनेतील फिर्यादी रमेशभाई भाईचंद पटेल ( हल्ली रा. सावंत चेंबर्स, ख्रिस्तगल्ली) हे अहमदनगर येहून लक्झरी बसने सुरत, गुजरात येथे निघाले होते. जाताना शिर्डी येथील खंडोबा मंदिरासमोर दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी व साक्षीदार यांना पोलीस असल्याची बतावणी केली. तुम्ही चोरी करुन आले असून पोलीस स्टेशनला चला असे सांगत लझरी बसमधून खाली उतरून तवेरा गाडीत बसवले व त्यांच्या जवळील पाच लाख रुपये रोख रक्कम काढून घेतले.

त्यानंतर फिर्यादीस कोपरगाव येथे सोडून देत त्यांनी पळ काढला होता. तत्कालीन पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याचा तपास करुन राजेंद्र मोहन फडतरे, विकास पोपट झरेकर, मनोज दत्तात्रय शिंदे, सचिन प्रकाश राजगुरु (सर्व रा. केडगाव), पंकज तान्हाजी गडाख (रा. टाकळी काझी, ता. नगर), नितीन पटेल यांना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला होता.

यातील मच्छिंद्र पोपट कांडेकर हा अद्यापपर्यंत फरार होता. दरम्यान पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार आहेर यांनी सफौ/राजेंद्र वाघ, रविंद्र कर्डीले, विशाल दळवी, देवेंद्र शेलार, मयुर गायकवाड व उमाकांत गावडे आदींचे पथक नेमून कारवाई सुरु केली.

वरील आरोपीचा शोध घेत असताना तो गोंदीया, नागपूर व झारखंड या ठिकाणी त्याचे नाव बदलून राहत असल्याची माहिती प्राप्त झाली. हा आरोपी २८ मार्च २४ रोजी कात्रड, वांबोरी, ता. राहुरी येथे त्याचे नातेवाईकांकडे येणार आहे. अशी गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली. पथकाने लागलीच तेथे जात पोलिसानी छापा टाकत त्यास ताब्यात घेतले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...