spot_img
ब्रेकिंगमंत्री मुंडेंचा राजीनामा घ्याच, पुरावे सादर करत दमानियांनी घोटाळ्याचा पाढाच वाचला

मंत्री मुंडेंचा राजीनामा घ्याच, पुरावे सादर करत दमानियांनी घोटाळ्याचा पाढाच वाचला

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी आरोपींसंदर्भात अनेक खुलासे केले आहेत. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप करत पुरावे सादर केले आहेत. ४ फेब्रुवारीला अंजली दमानिया यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या घोटाळ्यांचा पुराव्यासकट पाढाच वाचला. धनंजय मुंडे यांनी एका वर्षात अफाट पैसे खाल्ले असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अंजली दमानिया यांनी अनेक दावे करत खळबळजनक आरोप केले आहेत. डिबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे मिळणार होते. यासाठी बजेट ठरलं होतं. पण उत्पादनांच्या किंमती जास्त दाखवून कमी लाभार्थ्यांना लाभ देण्यात आलं असल्याचा खुलासा दमानिया यांनी केला आहे.

मुंडे कृषीमंत्री असताना नॅनो युरिया, नॅमो डीएपी आणि फवारणी पंपाच्या खरेदीत २७५ कोटींचा घोटाळा केला असल्याचा खुलासाही दमानिया यांनी केलाय. नॅनो युरियाची बॉटलला ९२ रूपये लागतात. पण मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं. तेव्हा २२० रूपयांना बॉटल घेतली. तेव्हा १९ लाख ३८ हजार ४०८ बॉटल २२० रूपयांमध्ये खरेदी केली. म्हणजेच दुपटीपेक्षा जास्त किंमतीनं बॉटल घेतल्या असल्याचा आरोप दमानिया यांनी केला. मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याची माहिती दिली.

तसेच गोगलगायी निर्मुलनाचं औषधही अव्वाच्या सव्वा दरानं खरेदी केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. एकेक बॅटरी स्प्रेअरमध्ये त्यांनी पैसे लाटले. ५० कोटींचे डिलरशीपचे नियम देखील बदलण्यात आले. कापूस साठवणुकीच्या बॅग खरेदीत ४२ कोटींचा घोटाळा केलाय. धनंजय मुंडे यांनी वर्षभरात अफाट पैसे खाल्ले असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे.

भगवान गडावर जाऊन पुरावे सादर करणार
धनंजय मुंडे यांनी केलेले घोटाळे पुराव्यासकट भगवान गडावर दाखवणार असल्याचं दमानिया यांनी सांगितलं. नम्रपणे सर्व पुरावे दाखवणार आणि धनंजय मुंडे यांना दिलेला पाठिंबा मागे घेण्याची विनंती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी करावी, अशी विनंती करेन, असंही अंजली दमानिया म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....