spot_img
ब्रेकिंगउमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सहा दिवसांचाच वेळ? दोन दिवस लागणार ब्रेक; कारण...

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सहा दिवसांचाच वेळ? दोन दिवस लागणार ब्रेक; कारण काय?, वाचा सविस्तर..

spot_img

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्राच्या १५ व्या विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आज मंगळवार (दि.22) पासून सुरू होणार असून शनिवार-रविवार सुट्टी असल्यामुळे दोन दिवसांचा ब्रेक लागणार आहे. त्यामुळे गुरुवार-शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्यास गर्दी होण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी कऱण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात होत आहे. तर २९ ऑक्टोबर ही अर्ज भऱण्याची शेवटची तारीख असणार आहे. राज्यातील निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे माहिती राज्याचे निवडणूक अधिकारी पारकर यांनी दिली.

राज्यातील प्रतिष्ठित नेते पूर्णपणे ताकदीने, रॅली काढत आपला उमेदारी अर्ज भरतील. शनिवार-रविवार सुट्टी असल्यामुळे गुरुवार-शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्यास गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यन, अर्ज भरण्यासाठी सर्वसाधारण उमेदवारांसाठी अनामत रक्कम दहा हजार रुपये इतकी आहे. तर एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अनामत रक्कम पाच हजार रुपये इतकी आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आठ दिवसांचा अवधी आहे. पण चौथा शनिवार आणि रविवार असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरता येणार नाही. सार्वजनिक सुट्टी असल्याने शनिवार आणि रविवारी उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे प्रत्याक्षात अर्ज भरण्यासाठी सहा दिवसांचाच वेळ असेल. सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेतच निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज द्यावा लागणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

फोन चार्जिंगसाठी विजेची गरज नाही; सूर्यप्रकाशाने चार्ज करता येणारी पॉवर बँक लाँच, किंमत किती?

नगर सहयाद्री वेब टीम:- अग्रगण्य इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड Ambrane ने नवीन सोलर पॉवर बँक ‘Solar...

आमदार सत्यजित तांबे यांनी का घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट? कारण आलं समोर…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नुकतीच आमदार सत्यजित तांबे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व...

काँग्रेसचा नगर शहर विधानसभेवर दावा; पहिला उमेदवारी अर्ज घेतला? वाचा सविस्तर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीचे अर्ज मिळण्याची व भरण्याची प्रक्रिया मंगळवार (दि.२२) सकाळ पासून...

अहो ताई, तालुक्याचा बाप कोण हे जनता ठरवणार; डाॅ सुजय विखे पाटलांनी साधला निशाणा..

बापाबद्दल नव्हे निष्क्रीय आमदाराबद्दल बोललो! राजकन्येला बोलण्यासाठी भाग पाडणारेच त्यांचा घात करणार पठार भागात युवकांकडून...