spot_img
ब्रेकिंगउमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सहा दिवसांचाच वेळ? दोन दिवस लागणार ब्रेक; कारण...

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सहा दिवसांचाच वेळ? दोन दिवस लागणार ब्रेक; कारण काय?, वाचा सविस्तर..

spot_img

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्राच्या १५ व्या विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आज मंगळवार (दि.22) पासून सुरू होणार असून शनिवार-रविवार सुट्टी असल्यामुळे दोन दिवसांचा ब्रेक लागणार आहे. त्यामुळे गुरुवार-शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्यास गर्दी होण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी कऱण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात होत आहे. तर २९ ऑक्टोबर ही अर्ज भऱण्याची शेवटची तारीख असणार आहे. राज्यातील निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे माहिती राज्याचे निवडणूक अधिकारी पारकर यांनी दिली.

राज्यातील प्रतिष्ठित नेते पूर्णपणे ताकदीने, रॅली काढत आपला उमेदारी अर्ज भरतील. शनिवार-रविवार सुट्टी असल्यामुळे गुरुवार-शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्यास गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यन, अर्ज भरण्यासाठी सर्वसाधारण उमेदवारांसाठी अनामत रक्कम दहा हजार रुपये इतकी आहे. तर एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अनामत रक्कम पाच हजार रुपये इतकी आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आठ दिवसांचा अवधी आहे. पण चौथा शनिवार आणि रविवार असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरता येणार नाही. सार्वजनिक सुट्टी असल्याने शनिवार आणि रविवारी उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे प्रत्याक्षात अर्ज भरण्यासाठी सहा दिवसांचाच वेळ असेल. सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेतच निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज द्यावा लागणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खळबळजनक! पुण्यात प्रसिद्ध प्रसिद्ध अभिनेत्याला अटक; बाथरूममध्ये केला लैंगिक अत्याचार?

Ashish Kapoor : मनोरंजन विश्वात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता...

नगर-मनमाड महामार्गावर अपघात; अहिल्यानगरचे सेवानिवृत्त शिक्षक ठार

Accident News: नगर-मनमाड महामार्गावर लागोपाठ दोन दिवसांत तीन अपघात झाले आहे. काल सायंकाळी साडेसात...

सरकारी कामात मिळणार यश, प्रगतीची संधी; आर्थिक लाभ वाचा, आजचे राशि भविष्य..

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य तुमची प्रिय व्यक्ती वैतागल्यामुळे - तुमच्या मनावर...

मराठा आरक्षणाचा GR फाडला, OBC नेते आक्रमक, आता राज्यव्यापी आंदोलन

पुणे / नगर सह्याद्री - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईतील आझाद मैदानावर...