spot_img
ब्रेकिंगअखेर 'ते' प्रकरण भोवल! संजय राऊत यांना १५ दिवसांचा तुरुंगवास?

अखेर ‘ते’ प्रकरण भोवल! संजय राऊत यांना १५ दिवसांचा तुरुंगवास?

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री:-
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायालयाने भाजप नेते किरीट सोमय्या यांना पत्नी मेघा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत यांना दोषी ठरवले आहे. याशिवाय संजय राऊत यांनाही १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षादेखील सुनावण्यात आली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या याचिकेवर मुंबईतील शिवडी न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी संपल्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना दोषी ठरवले. संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. मेधा सोमय्या यांनी त्यांचे आरोप फेटाळून लावत त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. ज्यावर सुनावणी पार पडली.

दरम्यान, याप्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. या निकालाची गुरुवारी सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने संजय राऊत दोषी असल्याचा निकाल दिला. न्यायालयाने संजय राऊत यांना २५ हजारांचा दंड आणि १५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हा संजय राऊत यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

१५ दिवसाची कैद असल्याने संजय राऊत जामीनास पात्र आहे. त्यानंतर आता संजय राऊत यांना रितसर न्यायालयासमोर हजर व्हावे लागेल. ते स्वत:ला सरेंडर करतील. त्यानंतर न्यायालय त्यांना जामीन मंजूर करण्याची शयता आहे. सुनावणीवेळी संजय राऊत न्यायालयात हजर नव्हते. परंतु न्यायालयाने आपल्या नियोजीत वेळेत निकालाचे वाचन पूर्ण करून राऊत यांना या प्रकरणी दोषी ठरवले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...