spot_img
महाराष्ट्रलेकीच्या लग्नाहून परतताना अपघात, वडिलांसह १ ठार; अहिल्यानगर मधील घटना

लेकीच्या लग्नाहून परतताना अपघात, वडिलांसह १ ठार; अहिल्यानगर मधील घटना

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
मुलीच्या लग्नानंतर पित्याचे अपघाती निधन झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (24 डिसेंबर) घडली. कर्जत तालुक्यातील गुरवपिंपरी येथील बाळासाहेब सूर्यवंशी यांची मुलगी वैष्णवी हीचा विवाह केदार जगताप यांच्यासोबत मिरजगाव येथील पाटील लॉन्स येथे मंगळवारी (24 डिसेंबर) दुपारी दोन वाजता झाला.

यानंतर वैष्णवी हिस सासरी जाण्यासाठी निरोप दिला. यावेळी बाळासाहेब सूर्यवंशी हे खूपच भावनिक झाले होते. स्वतःच्या मुलीला दुसऱ्याच्या घरी पाठवताना त्यांना दुःख अनावर झाले होते. मुलगी वैष्णवी तिच्यावर बाळासाहेब यांचे खूप प्रेम होते. त्यांनी अतिशय लाडामध्ये आणि प्रेमाने या मुलीला लहानाचे मोठे करून तिचा संभाळ केला होता.

आणि त्यानंतर बाळासाहेब सूर्यवंशी, नातेवाईक दिनेश सदाशिव कागदे (रा.इंदूर, मध्यप्रदेश) हे गुरवपिंपरी येथील घरी येत असताना त्यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. सदरच्या घटनेत दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महापालिकेत कोणताही घोटाळा नाही; आयुक्तांचे स्पष्टीकरण, आमदार जगताप यांच्याबद्दल म्हणाले…

  महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचे स्पष्टीकरण अहिल्यानगर / नगर सह्याद्री - महानगरपालिकेत सुमारे ७७६...

महादेव मुंडे हत्या प्रकरण: न्याय मिळत नसल्याने पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

ज्ञानेश्वरी मुंडेने घेतले विष । बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल बीड | नगर सह्याद्री राज्यात संतोष देशमुख...

११ गावांसह २१ वाड्यांना मिळणार पाणी; मंत्री विखे पाटील यांची मोठी माहिती

संगमनेर | नगर सह्याद्री अकोले तालुयातील पिंपळगाव खांड धरणातून संगमनेर तालुयातील पठार भागातील जवळे बाळेश्वरसह...

मविआच्या आमदारांचं टॉवेल-बनियनवर आंदोलन

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. बुधवारी विरोधकांनी सत्ताधार्‍यांविरोधात आक्रमक पवित्रा...