spot_img
देशदिल्लीत आपची घसरगुंडी; अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया, 'दारू घोटाळा नडला'

दिल्लीत आपची घसरगुंडी; अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया, ‘दारू घोटाळा नडला’

spot_img

राळेगणसिद्धी | नगर सह्याद्री
गेल्या दोन विधानसभा एकहाती सत्ता मिळविणाऱ्या आपला चौथ्या निवडणुकीत दिल्लीकरांनी खाली खेचले आहे. अद्याप निकाल हाती आलेले नसले तरी भाजपा 45, आप 25 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसचा तर सुफडा साफ झाला आहे. वेगवेगळे लढण्याची खुमखुमी काँग्रेस आणि आपला नडली असली तरी केजरीवालांचे एकेकाळचे सहकारी अण्णा हजारे यांची बोलकी प्रतिक्रिया आली आहे.

दिल्ली निकालावर अण्णा हजारे यांनी केजरीवालांना दारू घोटाळ्याने बुडविले, असे म्हटले आहे. काही दिवसांपूवच हजारेंनी केजरीवालांना स्वाथ म्हटले होते. अरविंद केजरीवाल पूव तो चांगला होता म्हणून माझ्यासोबत होता. मात्र ज्या दिवशी राजकारण आणि पाटच्या नादात अरविंद केजरीवाल स्वाथ झाला, तेव्हाच त्याच्यापासून मी दूर झालो, या शब्दांत अण्णा हजारे यांनी निशाणा साधला होता. तेव्हा त्याची नियत साफ होती. तेव्हा मला वाटले की, हा एक चांगला कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी त्याला सोबत घेतले होते, असे हजारे म्हणाले होते.

आजच्या आपच्या दिल्ली पराभवावर हजारेंनी म्हटले की, मी बऱ्याच काळापासून सांगत आलो आहे की निवडणूक लढवताना उमेदवाराचे चारित्र्य, चांगले विचार आणि प्रतिमेवर कोणताही डाग नसावा. पण, त्यांना (आप) ते समजले नाही. ते दारू आणि पैशात अडकले, त्यामुळे त्यांची (अरविंद केजरीवाल) प्रतिमा खराब झाली आणि म्हणूनच त्यांना निवडणुकीत कमी मते मिळत आहेत, असे मत हजारे यांनी व्यक्त केले.

तसेच लोकांनी पाहिले की केजरीवाल चारित्र्याबद्दल बोलतात पण दारूमध्ये वाहत गेले. कारण त्यात पैसा आला. राजकारणात आरोप केले जातात. पण दोषी नाही हे सिद्ध करावे लागते. सत्य सत्यच राहील. जेव्हा पहिली बैठक झाली तेव्हा मी ठरवले की मी पक्षाचा भाग राहणार नाही आणि मी त्या दिवसापासून दूर राहिलो, असे हजारे यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर तालुक्यात बिबट्याची भीती; गावांना दिवसा वीज पुरवठा करावा

माजी सभापती अभिलाष घिगे, सरपंच भाऊसाहेब बहिरट यांची महावितरणकडे मागणी सुनील चोभे | नगर सह्याद्री गेल्या...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भिजतं घोंगडं; याचिकेवर ‘या’ तारखेला सुनावणी होणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षणाच्या मर्यादेबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत मोठी...

कांद्याला भावच नाही, शेतकऱ्याने काय केले पहा…

रांधेतील शेतकर्‍याने कांद्याला भाव नसल्याने पीक केले नष्ट पारनेर | नगर सह्याद्री गेल्या वर्षभरात कांद्याला सरकारने...

अजित पवार.. सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय!; महाराष्ट्रात राजकारण तापले, माफीनामा अन कोण काय म्हणाले..

माजी आमदारपुत्राचं उपमुख्यमंत्र्यांना आव्हान; सोलापुरात वातावरण तापलं सोलापूर | नगर सह्याद्री सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुयातील अनगर...