spot_img
मनोरंजनआमिर खान बांधणार तिसऱ्यांदा लगीनगाठ?; तिसऱ्या विवाहच्या चर्चेबाबत आमिर खान काय म्हणाले?...

आमिर खान बांधणार तिसऱ्यांदा लगीनगाठ?; तिसऱ्या विवाहच्या चर्चेबाबत आमिर खान काय म्हणाले? पहा..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
बॉलीवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान याच्या वैयक्तिक आयुष्याच्या चर्चेत नेहमीच एक खास स्थान असतो. 2021 मध्ये आमिर खान आणि किरण राव यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यापासून त्याच्या तिसऱ्या विवाहाच्या चर्चेला उधाण आले आहे. आमिर खानच्या तिसऱ्या विवाहाबाबतच्या अफवा समोर येत आहेत, परंतु या संदर्भात त्यांनी नुकतेच मौन सोडले आहे.

आमिर खानने यापूर्वी दोन लग्ने केली आहेत. 18 एप्रिल 1986 रोजी त्याने रीना दत्तासोबत लग्न केले, ज्यातून त्याला जुनैद आणि इरा नावाची दोन मुले आहेत. त्यानंतर, आमिर खानने किरण रावसोबत 2005 मध्ये दुसरे लग्न केले आणि त्यांना आझाद नावाचा मुलगा आहे.

अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये आमिर खानने तिसऱ्या विवाहावर स्पष्टीकरण दिले. “लग्न एक कॅनव्हास आहे, जो दोन लोक एकत्र रंगवतात,” असे आमिरने सांगितले. तथापि, त्याने स्पष्ट केले की, “माझ्या वयाच्या 59 वर्षांत, मला वाटत नाही की मी पुन्हा लग्न करू शकेन. सध्या माझ्या आयुष्यात अनेक नाती आहेत आणि मी माझ्या कुटुंबासोबत आनंदी आहे.” आमिर खान सध्या ‘तारे जमीन पर’ या लोकप्रिय चित्रपटाच्या सिक्वेलवर काम करत आहे, ज्याचे नाव ‘सीतारे जमीन पर’ असे असणार आहे. या चित्रपटात जेनेलिया डिसूझा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी… नवाब मलिक यांना कोर्टाचा मोठा दणका… दाऊदच्या मालमत्ता प्रकरणात नेमकं काय घडलं?

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्यायालय विशेष...

शहाजी बापू संतापले; ‘भाजपचे राजकारण हिडीस अन् अबलेवर बलात्कार केल्यासारखे..’ नेमकं काय म्हणाले?

मुंबई / नगर सह्याद्री - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष...

पालक, शिक्षकांना मोबाइलच्या तोट्यांची माहिती देणार : मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी

जिल्हा परिषद व ‘ऋणानुबंध’च्या संयुक्त विद्यमाने मोबाइलवर कार्यशाळा अहिल्यानगर | नगर सह्याद्री विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी...

आश्रमशाळेच्या नावाखाली २ कोटी ४८ लाखांचा डल्ला; नगरमधील प्रकार

सद्गुरू रोहिदासजी संस्थेच्या अध्यक्षासह सात पदाधिकार्‍यांवर फसवणुकीचा गुन्हा अहिल्यानगर | नगर सह्याद्री  केंद्र शासनाकडून आश्रमशाळेसाठी मिळालेल्या...