spot_img
अहमदनगरदोन गटात तुफान राडा! दगडफेक करत वाहने जाळली? नगर जिल्ह्यात नेमकं चाललंय...

दोन गटात तुफान राडा! दगडफेक करत वाहने जाळली? नगर जिल्ह्यात नेमकं चाललंय काय?

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनात सातत्याने वाढ होतांना दिसत आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होत आहे. दरम्यान आता अकोल्यात दोन गटात मोठा वाद झाल्याची बातमी समोर आली आहे. वादाचे रूपांतर हाणामारीत होताच दोन गटाने एकमेकांवर दगफेक,तसेच जाळपोळ केल्याची घटना घडली आहे. दोन गटात मोठा राडा झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

अकोला शहरातील हरिहर पेठमध्ये दि. ०७ रोजी दुपारच्या सुमारास सदरचा प्रकार घडला. हरिहर पेठमध्ये रिक्षा आणि बाईकची धडक झाली. या धडकेमुळे किरकोळ वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यावसन मोठ्या राड्यात झाले. हे भांडण इतके वाढले की दोन गट आमनेसामने आले. वाद इतका टोकाला पोहोचला की दोन गटात तुफान राडा झाला. तसेच घटनेतील गाड्या देखील जाळण्यात आल्या.

या राड्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न संबंधित परिसरात निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. ही घटना अकोल्यातील हरीपेठ भागात घडली आहे. राड्या दरम्यान झालेल्या दगडफेकीमध्ये नागरिक जखमी झाले आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. दोन गटात मोठा राडा झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...