spot_img
अहमदनगरAhmednagar: अर्बन मध्ये ‘नवा’ ट्विस्ट !! अंदानीला अटक, नेमकं कनेक्शन काय? वाचा...

Ahmednagar: अर्बन मध्ये ‘नवा’ ट्विस्ट !! अंदानीला अटक, नेमकं कनेक्शन काय? वाचा सविस्तर

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
महाराष्ट्रभर गाजलेल्या नगर अर्बन गैर व्यवहार प्रकरणी अत्तापर्यत अनेकांना अटक केली आहे. अत्ता अर्बन बँक प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी दि १४ रोजी सीए शंकर घनशामदास अंदानी याना अटक केली आहे.

बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून नगर अर्बन बँकेतील २८ संशयित कर्ज प्रकरणात फसवणूक व १५० कोटींचा घोटाळा प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. नगर अर्बन बँक सध्या चांगलीच गाजत आहे. नगर अर्बन गैर व्यवहार प्रकरणी अत्तापर्यत माजी अध्यक्ष अशोक कटारिया, माजी संचालक मनेष साठे व अनिल कोठारी तसेच अधिकारी प्रदीप पाटील व राजेंद्र लुणिया या पाचजणांना अटक करण्यात आली आहे.

बँक फसवणूक प्रकरणी सीए विजय मर्दाला देखील अटक केली होती. अत्ता बँकेचा तज्ज्ञ संचालक म्हणून कार्यरत असणाऱ्या सीए अंदानी याला उपअधीक्षक मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अटक केली आहे. त्याने कर्जदारासोबत अनेक व्यवहार केल्याचे समोर आले असून त्याला आज न्यायालयासमोर हजर करणार आहे.

२० फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी
नगर अर्बन कर्ज घोटाळाप्रकरणी सीए व माजी तज्ज्ञ संचालक शंकर अंदानी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. शंकर अंदानी याला अटक केल्यानंतर आज न्यायालयात नेण्यात आले होते. न्यायालयाने शंकर अंदणी यास ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. २० फेब्रुवारी पर्यंत तो पोलीस कस्टडीत राहणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...