spot_img
महाराष्ट्रमहायुतीत मिठाचा खडा; 40 जागा द्याव्यात, अन्यथा 288 जागी उमेदवार उभे करणार...;...

महायुतीत मिठाचा खडा; 40 जागा द्याव्यात, अन्यथा 288 जागी उमेदवार उभे करणार…; कोणी दिला इशारा पहा

spot_img

अमरावती / नगर सह्याद्री –
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने आम्हाला 40 जागा द्याव्या, अन्यथा आम्ही संपूर्ण 288 जागांवर उमेदवार उभे करू असा इशारा महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने दिला आहे. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे अमरावती जिल्ह्यात पक्षाच्या मेळाव्यासाठी आले असता पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

आपल्या पक्षाची ताकद दाखवण्यासाठी आपल्याला 288 जागा लढवाव्या लागतील अशी भूमिका राज्य कार्यकारिणीने घेतली आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी आम्हाला किमान 12-12 जागा द्याव्या. सध्या आम्ही महायुतीत आहोत. मात्र, त्यांनी आम्हाला जागाच दिल्या नाहीत तर आम्हाला आमची तयारी करावी लागेल असेही महादेव जानकर यावेळी बोलताना म्हणाले.

या आधी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याचं जाहीर केलं आहे. त्यानंतर आता राष्ट्रीय समाज पक्षही स्वबळाची भाषा करत आहेत. या दोन्ही पक्षांनी लोकसभेमध्ये महायुतीला पाठिंबा दिला होता. महादेव जानकरांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातील परभणी लोकसभेतून निवडणूकही लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला.

महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने या आधीही स्वबळाची भाषा केली होती. विधानसभेच्या 288 जागांवर निवडणूक लढण्याचा निर्णय जर रासपच्या राज्य कार्यकारिणीने घेतला तर सगळ्या जागा लढवून असं महादेव जानकर म्हणाले होते. महायुतीमधून निवडणूक लढवायची असेल तर त्या संदर्भात युतीचा निर्णय नंतर घेतला जाईल. पण सध्या तरी 288 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

या आधीही महादेव जानकरांनी महायुतीकडून 50 जागांची मागणी केली होती. राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीमध्येच आहे, महायुतीने सन्मानजनक जागा द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. महायुतीत राष्ट्रीय समाज पक्षाला 50 जागा मिळाव्यात अन्यथा महाराष्ट्रात 288 जागा लढवणार असा इशारा महादेव जानकर यांनी दिली होता. शिवाय त्यांनी मुंबईतील गोवंडी आणि मागाठाणे या मतदारसंघांवर त्यांनी दावा ठोकलाय. विशेष म्हणजे सध्या मागठाणे विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे आमदार आहेत.

महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अद्यापही सुरू असून लवकरच तोडगा काढला जाईल अशी माहिती आहे. ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार ती जागा त्या पक्षाला या सूत्रानुसार 200 हून जागांचे वाटप झाल्याची माहिती आहे. ज्या जागा वादाच्या आहेत, ज्या ठिकाणी दोन किंवा अधिक पक्षांचा दावा आहे त्यावर सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भरधाव वाहनाच्या धडकेत बुलेटस्वाराचा मृत्यू; अहिल्यानगर मधील घटना…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर-संभाजीनगर महामार्गावर इमामपूर शिवारातील हॉटेल निसर्ग समोर एका अज्ञात भरधाव...

मोठी बातमी! शिंदेसेनेचा स्वबळाचा नारा; ऑनलाइन बैठकीत महत्वपूर्ण निर्णय..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली...

नगर शहरात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; स्कूल बस चालकाने केला विद्यार्थिनींचा विनयभंग

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरात विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एका नामांकित...

आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश!; ‘या’ महामार्गाच्या कामाला वेग..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर या राज्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या महामार्गाची दुरवस्था...