spot_img
अहमदनगरअहमदनगर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ! चार ठिकाणी घरफोडी; अकरा लाखांचा मुद्देमाल चोरीला

अहमदनगर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ! चार ठिकाणी घरफोडी; अकरा लाखांचा मुद्देमाल चोरीला

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
अहमदनगर शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. तोफखाना हद्दीत तीन ठिकाणी दिवसा घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली. तसेच, कोतवाली हद्दीतील चार दिवसांपासून बंद असलेल्या घरात घुसून दागिने आणि रोकड चोरून नेली. या चार ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी 10 लाख 80 हजारांचा ऐवज लांबविला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात 11 सप्टेंबर रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

1. साईनगर बंगला:
बुरूडगाव रस्त्यावरील साईनगरमधील बंगला फोडून चोरट्यांनी सुमारे 10 तोळ्यांचे सोन्याचे दागिने, अर्धा किलो चांदीचे दागिने आणि चार लाख 60 हजार रुपयांची रोकड लंपास केली. 7 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता बंगल्यावर कुलूप लावून बंद केले गेले होते, आणि 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता चोरीची घटना उघडकीस आली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2. धनलक्ष्मी रेसीडेन्सी
तपोवन रस्त्यावर समतानगर येथील धनलक्ष्मी रेसीडेन्सी मधील घर फोडून अज्ञात चोरट्यांनी एक लाखाची रोकड, सात तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि साडे सहा भाराचे चांदीचे दागिने चोरले. ही घटना 11 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी चार वाजेपर्यंत घडली.

3. मयुर कॉलनी
तपोवन रस्त्यावर मयुर कॉलनीतील व्यंकटेश अपार्टमेंट मधील दिपाली अविनाश दरंदले यांच्या घरातील 18 ग्रॅमचे सोन्याचे मिनी गंठण आणि चार हजार रुपयांची रोकड चोरून नेली. ही चोरी 11 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता घडली.

4. वर्षा मेडिकल
आडते बाजार येथील गौतम मनसुखलाल भंडारी यांच्या मेडिकल दुकानात चोरट्यांनी 50 हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना 10 सप्टेंबर रोजी रात्री नऊ ते 11 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान घडली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Ahmednagar Politics News: राष्ट्रवादीचे संपत बारस्कर आंदोलन छेडणार! कारण काय? वाचा सविस्तर

Ahmednagar Politics News; सावेडी उपनगर परिसरात बंधन लॉन ते राजवीर चौक ते भिस्तबाग महाल...

Ahmednagar Accident News: अहमदनगरमध्ये भीषण अपघात? तीन ठार; दोन गंभीर..

Ahmednagar Accident News: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदाता लुक्यातील पारगाव रस्त्यावर एक ते दीड तासाच्या अंतराने...

Pitru Paksha: पितृपक्षात श्राद्ध विधी करणे गरजेचा का आहे? महाभारताच्या १३ व्या अध्यायात नेमकं काय? जाणून घ्या

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात व्यक्तीने आपल्या पितरांच्या मोक्ष आणि समाधानासाठी श्राद्ध, तर्पण...

Ahmednagar Crime: खळबळजनक! पोलिसांना मध्यस्थी भोवली! आरोपींकडून मारहाण; कुठे घडला प्रकार?

Ahmednagar Crime: कोपरगाव तहसील कार्यालयात शेजारी असलेल्या लॉकपगार्ड येथे आरोपी आपापसात भांडत करत असतांना...