spot_img
अहमदनगरपोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने झाला राडा; पुढे घडले असे...

पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने झाला राडा; पुढे घडले असे…

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री
पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून दोघा भावांना लोखंडी गज व लाकडी दांडक्याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शनिवारी (1 फेब्रुवारी) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास देहरे (ता. नगर) शिवारात घडला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द रविवारी (2 फेब्रुवारी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजी दशरथ रोकडे (वय 60) यांनी फिर्याद दिली आहे. किशोर भाऊराव जाधव, रोहन किशोर जाधव, अक्षय किशोर जाधव व सुमन किशोर जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी व त्याचा भाऊ प्रमोद रोकडे शनिवारी सकाळी सव्वा दहा वाजता देहरे येथे चावडीवर बसलेले असताना, संशयित आरोपी किशोर जाधव व इतर चावडीवर आले. त्यांनी फिर्यादीस उद्देशून तुम्ही आमच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये केस का केली? असे विचारले आणि अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात किशोरने लोखंडी गजाने प्रमोद यांना मारहाण केली, तर रोहनने लाकडी दांडक्याने वार करून फिर्यादीस जखमी केले. त्यानंतर लाथाबुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली आणि पुन्हा पोलीस ठाण्यात गेलात तर काटा काढीन अशी धमकी दिली.

या प्रकारानंतर जखमींनी तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार मिसाळ करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....