अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नागरिकांनी ज्या पद्धतीने आपले घर स्वच्छ ठेवतात, त्याच पद्धतीने आपला परिसर आणि शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. घंटागाडीमध्येच कचरा टाकावा, रस्त्यावर फेकू नये. काही नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यांवर कचरा साचतो आणि नाले बंद होतात. महानगरपालिकेने स्वच्छतेचे काम हाती घेतले असून नागरिकांचे सहकार्य देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आजच्या मोहिमेत शहराच्या स्वच्छतेसाठी कॉम्पॅक्टर वाहनांची मदत झाली. 
रस्त्यांवर आणि दुभाजकाजवळ साचलेली माती हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. विशेष म्हणजे, पत्रकार चौक येथील भगतसिंग उद्यान, जे काही काळापासून दुर्लक्षित होते, तेथेही मोठ्या प्रमाणात साफसफाई करण्यात आली. उद्यान परिसरातील माती व कचऱ्याचे ढिगारे काढून टाकण्यात आले आणि गवताची सफाई करण्यात आली. असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले
शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून केली. त्यांनी भगतसिंग उद्यान परिसरासह माळीवाडा रस्ता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, सक्कर चौक काँक्रिटीकरण रस्ता या ठिकाणांची स्वच्छतेची पाहणी केली मनपाचे आयुक्त यशवंत डांगे यांनी माहिती दिली की, शहरात आता दररोज दोन वेळा स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. सकाळी 6 ते 10 आणि दुपारी 2 ते 6 या वेळेत. घनकचरा विभागाच्या माध्यमातून रस्त्यावरील कचरा, मातीचे ढिगारे, आणि दुभाजकाजवळ जमा झालेली माती गोळा करून स्वच्छता केली जात आहे.
मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले की, शहरात आता कॉम्पॅक्टर मशीनद्वारे आधुनिक पद्धतीने स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. यामुळे कचऱ्याचे संकलन आणि व्यवस्थापन अधिक परिणामकारक पद्धतीने होणार आहे. शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरातील कचरा वेळेवर घंटागाडीत द्यावा आणि स्वच्छतेत सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या स्वच्छता अभियानामुळे अहिल्यानगर शहरातील स्वच्छतेबाबत एक सकारात्मक पाऊल उचलले गेले असून, नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.



 
                                    
