spot_img
ब्रेकिंगसणासुदीच्या काळात ‘लाल परी’ला ब्रेक; कारण काय?

सणासुदीच्या काळात ‘लाल परी’ला ब्रेक; कारण काय?

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री: –
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उचलले आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून, यामुळे ऐन सणासुदीत प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

एसटी कर्मचारी संघटनेकडून करण्यात आलेल्या संपाच्या प्रमुख मागणीमध्ये, राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन देण्याची मागणी आहे. याशिवाय आर्थिक बाबी, खासगीकरण यासारख्या विविध मागण्यांसाठी विधानसभेची आचारसंहिता लागू होण्याआधी निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

अकरा एसटी कामगार संघटनांनी एकत्र येऊन आज राज्यभरात आंदोलन पुकारले आहे. सणासुदीच्या काळात संप पुकारल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी दोन सप्टेंबरपर्यंत शासनाला त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मुदत दिली होती. या मुदतीत मागण्या मान्य न केल्यास ३ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला होता. संपामुळे एसटीला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कोतकरांच्या अर्जावर शंकर राऊत यांचा आक्षेप; पत्रकार परिषदेत दिली मोठी माहिती..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- अशोक लांडे खून प्रकरणात शिक्षा लागलेले संदीप, सचिन, अमोल कोतकर यांच्या...

मराठा आरक्षणासाठी अहमदनगर बंद!

अहमदनगर | नगर सह्याद्री मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ अहमदनगर येथील मराठा आंदोलकांनी आज...

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहिण’ योजनेचा तिसरा हप्त्याची तारीख ठरली; कधी होणार जमा? वाचा..

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे...

Sharad Pawar: महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण? शरद पवार यांनी दिले १९७७ सालचे उदाहरण! एकदा वाचाच..

Sharad Pawar: राज्यात विधानसभेचे वारे वाहु लागले आहे.महाविकास आघाडीकडून आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती आखण्यास...