spot_img
ब्रेकिंगमहायुती नवा डाव टकाकणार! मध्यरात्री बैठक; विधानसभेचा जाहीरनामा ठरला? ‘या’ प्रश्नांना देणार...

महायुती नवा डाव टकाकणार! मध्यरात्री बैठक; विधानसभेचा जाहीरनामा ठरला? ‘या’ प्रश्नांना देणार प्राधान्य..

spot_img

Politics News: लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक राज्याचा दौरा करून गेल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते अलर्ट मोडमध्ये गेले आहेत. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या मुंबईतील वर्षा निवासस्थानी शनिवारी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. दीड ते दोन तास चाललेल्या बैठकीत जागावाटपावर आणि महायुतीच्या जाहीरनाम्याच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. जाहीरनाम्यात सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.

आगामी निवडणुकीतील अडचणींच्या उपाययोजना आणि तिन्ही पक्षांच्या संभाव्य मताधिक्याबाबत देखील विचारविनिमय झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यात या बाबीवर चर्चा झाली होती.

त्यानुसार, भाजप १५० ते १६० जागांवर, शिवसेना ८० ते ९० जागांवर आणि अजित पवार गट ४५ ते ५० जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. या फॉर्म्युल्यात कोणतेही बदल होणार का, हे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीही विधानसभेसाठी जोरदार तयारीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोण गुलाल उधळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विधानसभेला जोरका झटका देणार, महायुतीचे काम नाही करणार?, नगच्या राजकारणात नेमकं शिजतंय काय?, कोणी केलं वक्तव्य..

Politics News: श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ हा राखीव असून येथे आरपीआयला उमेदवारी मिळावी. कारण गेल्या...

महाविकास आघाडीचे उमेदवार कोण ठरवणार? ‘या’ तीन नेत्यांना दिले अधिकार

  Politics News: विधानसभा निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय पक्षाची...

‘त्यांच्या’ मेंदूत ५० टक्के शेण! आमदार रोहित पवार यांचा ‘यांनी’ घेतला समाचार

Politics News: विधानसभा निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय पक्षाची...

बळीराजासाठी महत्वाची बातमी! अनुदान मिळण्यासाठी ‘ती’ नोंदणी केली का?, सरकारने घेतला ‘मोठा’ निर्णय..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- कापूस आणि सोयाबीन पिकांच्या अर्थसहाय्याच्या लाभासाठी आता ई-पीक पाहणी पोर्टलवर...