spot_img
अहमदनगरशिवस्वराज्य यात्रेत खासदार 'कोल्हे' यांच्याकडून माजी आमदार 'जगताप' यांचे कौतुक! बुलडोजर फिरवला...

शिवस्वराज्य यात्रेत खासदार ‘कोल्हे’ यांच्याकडून माजी आमदार ‘जगताप’ यांचे कौतुक! बुलडोजर फिरवला तरी पवार साहेबांना सोडणार?

spot_img

Politics News: जिल्हा बँकेचे ( District Bank ) कर्ज घेण्यासाठी राज्यातील अनेक कारखानदार सरकारच्या राजकीय आमिषाला बळी पडले. सरकारच्या पक्षात सामिल झाले. पण श्रीगोंद्याचे माजी आमदार राहूल जगताप ( Rahul Jagtap) यांचा अभिमान आहे, त्यांनी सत्तेपुढे मान झुकवली नाही. अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe ) यांनी राहूल जगताप यांचे कौतुक करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचे गुरुवार दि.२६ रोजी रात्री उशिरा आगमन झाले. परंतु सभेसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार नीलेश लंके, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अतुल लोखंडे, दीपकपाटील भोसले, हरिदास शिर्के, केशवराव मगर, जिजाबापु शिंदे आदी उपस्थितीत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस होते.

यावेळी खासदार कोल्हे म्हणाले, राज्यातील अनेक कारखान्यांना थकहमी देण्यात आली. कर्ज बसत नसतानाही काही कारखान्यांना कर्ज देण्यात आले. पण कुकडी सहकारी साखर कारखाना, घोडगंगा सहकारी साखर कारखाना यांनानियमात असतानाही कर्ज नाकारण्यात आले. ज्यांनी फाईल अडवली त्यांनी त्यांना काय हवे होते? हे सगळ्यांना माहिती आहे. पण आम्हाला राहूल दादा जगताप यांचा अभिमान आहे. त्यांनी साहेबांची साथ सोडली नाही. सरकारच्या सत्तेपुढे मान झुकवली नाही. आता आगामी विधानसभा निवडणूकीत ते दाखवून द्यायचे आहे. अनेक प्रलोभने येतील, अनेक मतमंतात्तरे होती, पण शेतकऱ्यांचे भले करणारे, महाराष्ट्राचा स्वाभीमान जपणारे, तरुणांचे हित जोपासणारे सरकार सत्तेत यावे. त्यासाठी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आणा आणि त्यासाठी श्रीगोंद्यातून महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकुन द्या असे आवाहन कोल्हे यांनी केले.

जनतेच्या मनातीलच उमेदवार असणार; जयंत पाटील ( प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्ष)  
एकदा लाट आली की, पैशाला महत्व नसते. तुम्ही ते लोकसभेला दाखवून दिले. मतदारांच्या मनात जे असते तेच मतदार करून दाखवितात. लोकसभेत ते मतदारांनी दाखविले आहे. आम्हाल मानणाऱ्या नेत्यांचे कारखान्यांना कर्ज देताना खड्‌यासारखे बाजूला काढले. आता निगेटिव्ह मुद्दा राहिलेला नाही. पण शरद पवार यांनी आता कुकडीचा प्रश्न सोडला आहे. त्यामुळे तुमच्या मनात जो आहे तोच येथील उमेदवार असेल, काळजी करु नका असे सांगत जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे राहूल जगताप यांना पसंती दिली.  

बुलडोजर फिरवला तरी पवार साहेबांना सोडणार
जिल्हा बँकेचे कर्ज कुकडी कारखान्याला मिळत होते. पण आम्ही साहेबांसोबत आहोत म्हणून आम्हाला डावलले गले. पण आम्ही साहेबांची साथ सोडली नाही, आन सोडणार नाही. कुकडीची अडचण पवार साहेबांनीच सोडवली असून येत्या ५ आक्टोंबरपर्यंत सगळी थकीत देणी अदा करण्यात येणार आहे. आमच्यावर बुल डोजर जरी फिरवला तरी आम्ही पवार साहेबांना सोडणार नाही. विधानसभेला ५० हजार मतांचे लिड घेवून महाविकार आघाडीचा उमेदवार जिंकेल असा
विश्वास माजी आमदार राहूल जगताप यांनी व्यक्त केला. 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सरकारच्या घोषणा ‘लाडक्या खुर्चीसाठी’; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल | नगरमध्ये शिवस्वराज्य यात्रा अहमदनगर | नगर सह्याद्री:- सध्या राज्यात...

‘परतीच्या पावसामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी’

अमदनगरमध्ये ९१६ हेक्टरवर नुकसान मुंबई | नगर सह्याद्री:- राज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पडणार्‍या परतीच्या पावासाने मोठं...

Ahmednagar Crime: एमआयडीसीत अवैध धंदा? दोन जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर | नगर सह्याद्री ग्राहक दक्षता कल्याण फाऊंडेशनच्या तक्रारीनंतर पुरवठा विभागाने नगर- मनमाड रस्त्यालगत एमआयडीसी...

विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार! पत्रकार परिषदेत कोणी दिला इशारा?, कारण काय? वाचा..

अहमदनगर । नगर सह्याद्री:- धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, अशी गेली 68 वर्षांपासून मागणी...