spot_img
अहमदनगरबुऱ्हाणनगर योजनेचा पाणी पुरवठा सुरु करा; शिवसेनेचे संदेश कार्ले यांचे झेडपीमध्ये आंदोलन...

बुऱ्हाणनगर योजनेचा पाणी पुरवठा सुरु करा; शिवसेनेचे संदेश कार्ले यांचे झेडपीमध्ये आंदोलन…

spot_img

सुनील चोभे / नगर सह्याद्री
बुऱ्हाणनगर पाणी पूरवठा योजना सुरु असूनही सोलापूर रोडवरील दरेवाडी, वाकोडी गावांना पाणी मिळत नाही. आषाढी एकादशी निमित्त वारकरी पंढरपूरला जातं आहेत.त्यासाठी पाण्याची मोठी आवश्यकता आहे. त्यामुळे बुऱ्हाणनगर पाणी योजनेचा सोलापूर रोडवरील गावांना पाणी पूरवठा तातडीने सुरु करण्यात यावा या मागणी साठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद गेट वर ठिय्या आंदोलन केले.

– बुऱ्हाणनगर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरु असूनही १८ जून पासून नगर तालुक्यातील दरेवाडी वाकोडी या सोलापुर रोडवरील गावांना पाणी पुखठा झालेला नाही. योजना सुरु असुनही पाणी पुरवठा बंद आहे. सध्या आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी मोठ्या प्रमाणात पंढरपूरकडे जातं आहेत.

काल दहिगाव, साकत येथे या गावात संत निवृतीनाथांची दिंडी मुक्कामास होती. सुमारे ५०ते ६० हजार वारकरी मुक्कामास होते. सध्या रोज तेवढेच वारकरी पंढरपूरकडे या रस्त्याने जातं आहेत. त्यांना देण्यासाठी लोकांकडे पाण्याचा थेंब नाही. तरी तातडीने कार्यवाही करून पाणी योजना सुरु करावी अशी मागणी कार्ले यांनी केली आहे. याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

आंदोलनामध्ये उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्यासह माजी सभापती रामदास भोर, राजू गवळी, बाळासाहेब करांडे, भगवान करांडे, अमोल तोडमल सहभागी झाले होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विधानसभेला जोरका झटका देणार, महायुतीचे काम नाही करणार?, नगच्या राजकारणात नेमकं शिजतंय काय?, कोणी केलं वक्तव्य..

Politics News: श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ हा राखीव असून येथे आरपीआयला उमेदवारी मिळावी. कारण गेल्या...

महाविकास आघाडीचे उमेदवार कोण ठरवणार? ‘या’ तीन नेत्यांना दिले अधिकार

  Politics News: विधानसभा निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय पक्षाची...

‘त्यांच्या’ मेंदूत ५० टक्के शेण! आमदार रोहित पवार यांचा ‘यांनी’ घेतला समाचार

Politics News: विधानसभा निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय पक्षाची...

बळीराजासाठी महत्वाची बातमी! अनुदान मिळण्यासाठी ‘ती’ नोंदणी केली का?, सरकारने घेतला ‘मोठा’ निर्णय..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- कापूस आणि सोयाबीन पिकांच्या अर्थसहाय्याच्या लाभासाठी आता ई-पीक पाहणी पोर्टलवर...