spot_img
अहमदनगरपाण्यात उतरलेल्या विजेच्या तारांचा दोन बैलांना स्पर्श, यानंतर जे घडलं ते धक्कादायक!...

पाण्यात उतरलेल्या विजेच्या तारांचा दोन बैलांना स्पर्श, यानंतर जे घडलं ते धक्कादायक! बैलगाडीमध्ये होते पती-पत्नी..

spot_img

जामखेड
शेतातील काम संपल्यानंतर बैलगाडीतून संध्याकाळी पती-पत्नी घरी परतत होते. यावेळी अचानक विद्युतपोलचा वीजप्रवाह रस्त्यावरील पाण्यात उतरला होता. याचा दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या बैलगाडीच्या बैलांना विजेचा धक्का बसल्याने दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला. मात्र प्रसंगावधान राखून पती व पत्नी यांनी बैलगाडीतून बाहेर उड्या मारल्याने ते या आपघातुन बालंबाल बचावले आहे.

गुरुवार दि २० जुन रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जामखेड तालुक्यातील वाघा गावातील शेतकरी सुखदेव बबन बारस्कर हे आपल्या पत्नीसह बैलगाडीतून शेतात गेले होते. दिवसभर शेतातील काम ओटपुन संध्याकाळी आपल्या घरी परतत होते. यावेळी पाऊस देखील सुरु होता. यावेळी बैलगाडीतून आपल्या घरी परतत असताना वाघा गावात एका लाईटच्या पोलचा वीज प्रवाह पावसाने रस्त्यावर साठलेल्या पाण्यात उतरला होता.

दरम्यान बैलगाडी तेथुन जात असतानाच बैलांना विजेचा धक्का बसला. त्यामध्ये दोन्हीही बैलाचा जागीच मृत्यू झाला तर प्रसंगावधान राखून पती पत्नी यांनी बैलगाडीतून बाहेर उड्या मारल्याने ते या आपघातुन बालंबाल बचावले. सदर घटनेमध्ये शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून तातडीने घटनेचा पंचनामा करुन शेतकर्‍यास आर्थिक मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थानांकडून होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात ‘या’ धार्मिक स्थळी पिंड दान करा; पितरांना मिळतो मोक्ष आणि नाहीसा होतो पितृदोष

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात पिंडदान केल्याने पितरांना मोक्ष मिळतो आणि पितृदोष दूर...

politics news: पराभवाचा वचपा काढण्यासाठी कर्डीले सज्ज? राहुरीत कर्डिले विरुद्ध तनपुरेच!

अहमदनगर । नगर सहयाद्री :- लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राज्यात...

ठरलं! उमेदवारांची पहिली यादी ‘या’ तारखेला जाहीर होणार? भाजप किती जागा लढवणार?, वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. निवडणूक आयोग लवकरच पत्रकार परिषद...

२४ सप्टेंबरपासून पारनेरकर करणार आमरण उपोषण! नेमकी मागणी काय? वाचा सविस्तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- सरसकट कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्र शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली...