spot_img
अहमदनगरAhmednagar News: मजूर महिलांना घेऊन जाणारा पिकअप पोहचलाच नाही? वाटेतच घडलं असं...

Ahmednagar News: मजूर महिलांना घेऊन जाणारा पिकअप पोहचलाच नाही? वाटेतच घडलं असं काही, महिलांनी हंबरडाच फोडला..

spot_img

कोपरगाव । नगर सहयाद्री-
तालुक्यातील कोळपेवाडी येथील महिला मजुरांना घरी सोडण्यासाठी येणारा पिकअप शिर्डी- नाशिक महामार्गावर वावी परिसरात गोडगे पब्लिक स्कूल समोर उलटल्याने यातील एक महिला व एक पुरुष ठार झाले तर १८ महिला व ड्रायव्हर सह दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून एक महिला अत्यवस्थ आहे. या पिकअप मध्ये महिला पुरुष अशा एकूण २१ व्यक्ती होत्या.

अधिक माहिती अशी: कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी, मळेगाव व येवला तालुक्यातील काही मोलमजुरी करणाऱ्या महिला व पुरुष एनएच १६० या राष्ट्रीय महामार्गाच्या लगतचे छोटे मोठे गवत काढण्याचे व साफसफाई करण्याचे कामासाठी कोळपेवाडी बरून बावी येथे नियमितपणे जाते. त्यासाठी कोळपेवाडी बरून आपली वाहने वावी या ठिकाणी ठेवून तेथून पिकअप वाहनातून पुढे कामासाठी जात होते व संध्याकाळी पुन्हा या सर्व मजुरांना बाबी येथे त्यांच्या वाहनाजवळ ठेकेदाराकडून सोडण्यात येत असे.

त्याप्रमाणे बुधवार दिनांक १९ रोजी आपल्या कामाची सुट्टी झाल्यानंतर या मजुरांना कोळपेवाडी येथे जाण्यासाठी बाबी येथे सोडविण्यासाठी निघालेला पिकअप एमएच १४ डीएम १४५४ हा वावी जवळील गोडगे पब्लिक स्कूल समोर सायंकाळी सव्वा सहा ते साडे सहाच्या सुमारास उलटला. त्यामुळे या वाहनातील महिला व पुरुष मजूर रस्त्यावर फेकले गेले. यापैकी एक महिला गंभीर जखमी होऊन जागेवरच मयत झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच एक पुरुष देखील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना मयत झाला आहे.

दुसरी एक महिला देखीलअत्यवस्थ असल्याची माहिती मिळाली आहे. इतर महिला व दोन पुरुषांना सिनर व नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अपघात घडल्यानंतर जखमी महिलांनी हंबरडा फोडला होता. वेळेत रुग्णवाहिका दाखल झाल्यामुळे जखमींना वेळेत रुणालयात दाखल करण्यात आले. जखमी महिलांमध्ये काही महिला या साठ वर्षे वयापेक्षा जास्त असल्याची माहिती हाती आली असून राष्ट्रीय महामार्गाचे स्वच्छतेचे काम घेणाऱ्या ठेकेदाराने या मजूर महिलांचा अपघात विमा काढला आहे किंवा नाही याचाबत माहिती मिळू शकली नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात ‘या’ धार्मिक स्थळी पिंड दान करा; पितरांना मिळतो मोक्ष आणि नाहीसा होतो पितृदोष

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात पिंडदान केल्याने पितरांना मोक्ष मिळतो आणि पितृदोष दूर...

politics news: पराभवाचा वचपा काढण्यासाठी कर्डीले सज्ज? राहुरीत कर्डिले विरुद्ध तनपुरेच!

अहमदनगर । नगर सहयाद्री :- लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राज्यात...

ठरलं! उमेदवारांची पहिली यादी ‘या’ तारखेला जाहीर होणार? भाजप किती जागा लढवणार?, वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. निवडणूक आयोग लवकरच पत्रकार परिषद...

२४ सप्टेंबरपासून पारनेरकर करणार आमरण उपोषण! नेमकी मागणी काय? वाचा सविस्तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- सरसकट कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्र शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली...