spot_img
अहमदनगरवाढदिवसाची पार्टी मजुराच्या जीवावर बेतली! 'त्या' महामार्गावर नेमकं घडलं काय? पहा..

वाढदिवसाची पार्टी मजुराच्या जीवावर बेतली! ‘त्या’ महामार्गावर नेमकं घडलं काय? पहा..

spot_img

निघोज । नगर सहयाद्री
कवठे यमाई तालुका शिरूर येथे एका मित्रांच्या वाढदिवसाची पार्टी करून धाब्यावरून उलट्या दिशेने येणाऱ्या चार चाकी गाडीने धडक दिल्याने एका निष्पाप तरुण मजुराचा जागीच मृत्यू झाल्यांची घटना घडली आहे.

कवठे यमाई येथे अष्टविनायक महामार्गावर एका धाब्याच्या जवळ हा अपघात बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास झाला. फिर्यादी अमोल गोरक्ष येठेकर ( (वय 34 वर्षे, व्यवसाय शेती, रा.गुंडेगाव, ता. अहमदनगर) यांनी फिर्याद दिली असून दिपक जालिंदर येठेकर (वय ३३ वर्षे,रा. गुंदेगाव) यांचा मृत्यु झाला आहे.

अधिक माहिती अशी: कवठे येमा-पारगाव रस्त्यावर फिर्यादी यांचा चुलत भाऊ दिपक येठेक आणि रंगनाथ आढाव हे दोघे दुचाकी ( क्र, एम. एच. 16. सी. आर.7785 ) घेऊन जेवणाचा डब्बा आणण्या करीता गेला असता विरोध दिशेने येणाऱ्या भरधाव इको कार ( क्र, एम.एच.12.टी.डी.8718 ) ने मोटार सायकलला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दिपक येठेकर याचा मृत्यू झाला असून रंगनाथ आढाव गंभिर जखमी झाले आहे.

वाढदिवसाची पार्टी मजुराच्या जीवावर बेतली
चार चाकी गाडी चालविणारे तरुण हे एका मित्रांच्या वाढदिवसाची पार्टी असल्यांने धाब्यावर मद्य सेवन करीत फार्महाऊस वर बकऱ्यावर ताव मारायला निघाल्याची चर्चा परीसरात आहे. त्यामुळे वाढदिवसाची पार्टी मात्र एका गरीब मजुराच्या जीवावर बेतली असुन गाडी चालक पसार झाला आहे. गाडीचा मालक कोण ? चालक कोण ? याचा तपास करून आरोपीला गजाआड करण्याची मागणी नागरीकाकडून केली जात आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...