spot_img
देशमहाराष्ट्रात मान्सूनचे दमदार आगमन! ‘या’ भागात आज मुसळधार कोसळणार

महाराष्ट्रात मान्सूनचे दमदार आगमन! ‘या’ भागात आज मुसळधार कोसळणार

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री
मान्सूनने केरळमध्ये प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्रात पाऊस कधी सुरू होणार अशी चर्चा होती. आता मात्र बळीराजासाठी खूशखबर मिळाली आहे. राज्यात मान्सूनच्या पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. त्यामुळे राज्यात पुढील ३ दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनचा पाऊसाने गुरुवारी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये हजेरी लावली आहे. तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापुरात पावसाने तुफान बॅटिंग केली.

तसेच येत्या ३ दिवसांत मान्सून मुंबईसह विदर्भ तसेच मराठवाड्यात धडक देईल. त्यामुळे शनिवारपासून जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आज मुंबई, पुणे, ठाणे, पालघर नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस होऊ शकतो, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...