spot_img
ब्रेकिंगAhmednagar News:अस्मानी संकटाचा कहर! वीज कोसळून माय-लेकाचा मृत्यू, कुठे घडली घटना?

Ahmednagar News:अस्मानी संकटाचा कहर! वीज कोसळून माय-लेकाचा मृत्यू, कुठे घडली घटना?

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री-
श्रीगोंदा तालुक्यातील येवती इथं शेतात वीज कोसळल्याने न शेतकरी कुटुंबातील माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नवनाथ बाजीराव आढाव (२६) व मीनाबाई बाजीराव आढाव (५०, रा. दोघेही येवती, ता. श्रीगोंदा) अशी या घटनेत मृत्यू झालेल्या मायलेकरांची नावे आहेत.

शेतकरी कुटुंबातील माय लेकरांवर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज (दि.२२) सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील येवती गावात घडली. पावसाचे वातावरण झाले म्हणून नवनाथ व मीनाबाई हे शेतामध्ये कांदे झाकण्यासाठी गेले होते. पाऊस आल्यामुळे ते झाडाच्या आडोशाला थांबले होते. यावेळी अचानक त्यांच्या अंगावर बीज पडून त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

वीज एवढी भयंकर पडली की, त्या ठिकाणी लिंबाचे झाड भुईसपट झाले. मोठा आवाज आल्यामुळे शेजारील शेतकर्यांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. त्यांनी त्या जागी जाऊन पाहिले असता मीनाबाई बाजीराव आढाव व त्यांचा मुलगा नवनाथ बाजीराव आढाव हे जागीच मृत्यू झालेले त्यांना दिसून आले. या घटनेने परिसरातून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग; ‘यांनी’ घेतली आदित्य ठाकरे यांची भेट

पारनेर । नगर सहयाद्री विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे....

‘सलमान खानची’ सुपारी घेणाऱ्या ‘सुक्खा कालूयाला’ बेड्या

मुंबई । नगर सहयाद्री:- मुंबई मध्ये १२ ऑक्टोबरला बाबा सिद्धी यांची खेरवाडी येथे गोळ्या झाडून...

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...