spot_img
ब्रेकिंगPolitics News: ८५ वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात? लोकसभा संपताच विधानसभेची पेरणी सुरू

Politics News: ८५ वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात? लोकसभा संपताच विधानसभेची पेरणी सुरू

spot_img

पुणे । नगर सहयाद्री-
मागच्या आठवड्यात ज्येष्ठ नेते शरद पवारांनी बारामती लोकसभा मतदार संघातील चार मतदार संघांचा दौरा केल्यानंतर मंगळवारपासून पुन्हा तीन दिवस बारामती तालुक्याचा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यात ते संपूर्ण बारामती पिंजून काढणार असल्याचे बोलले जात आहे. अशाप्रकारे बारामती तालुका पिंजून काढणे म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शह देण्याच्या शरद पवार तयारीत असल्याच्या चर्चा संपूर्ण बारामतीसह राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

शरद पवार यांनी मंगळवारी बारामती तालुक्यातील निंबुत या गावापासून तीन दिवसीय दौऱ्याची तयारी केली. त्यांच्या या दौऱ्यात युगेंद्र पवार देखील सहभागी झाले आहेत. लोकसभा निवडणूक संपताच शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीची पेरणी सुरू केली आहे. शरद पवार सध्या बारामती आणि परिसराचा दौरा करत आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामती तालुक्यात शेतकरी मेळावे होणार आहेत. ३ दिवसांत शरद पवार ११ शेतकरी मेळाव्यांना हजेरी लावणार आहेत.

३५ वर्षांपूर्वी शरद पवार यांनी बारामतीचा कारभार अजित पवार यांच्याकडे सोपवल्यावर कधीच असा बारामतीचा भाग पिंजून काढला नव्हता. मात्र, आता शरद पवार पुन्हा मैदानात उतरले आहेत.आता खुद शरद पवार बारामती तालुका पिंजून काढत असल्यानं अजित पवारांच्या अडचणी वाढणार आहेत.

शरद पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन
शरद पवारांनी नुकतंच दुष्काळी दौऱ्या दरम्यान स्थानिकांशी संवाद साधला. तेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारकडे विनंती करणार आहे. मात्र सध्याचं सरकार माझं किती ऐकेल हे माहिती नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर राज्य हातात पाहिजे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला जसं आपण साथ दिली तशीच आगामी विधानसभा निवडणुकीतही साथ द्यावी, अशी साद पवारांनी शेतकऱ्यांना घातली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...