spot_img
अहमदनगरबिबट्याच्या हल्ल्यात पारनेर तालुक्यात 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात पारनेर तालुक्यात 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

spot_img

 

कळस परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाकडे तातडीने कारवाईची मागणी

गणेश जगदाळे / नगर सह्याद्री :
पारनेर तालुक्यातील कळस येथे मंगळवारी (दि. 2 सप्टेंबर 2025) रात्री साडेसातच्या सुमारास बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यात गणेश तुळशीराम गाडगे (वय 40) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील सुतार वस्तीजवळ ही धक्कादायक घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश गाडगे हे कळसहून रानमळ्याच्या रस्त्याने घरी परतत असताना बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. रात्री आठ वाजेपर्यंत ते घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता हा प्रकार उघडकीस आला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तेव्हाच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कळस परिसरात उसाचे प्रमाण जास्त असल्याने या भागात बिबट्यांचा वावर नेहमीच जाणवतो. यापूर्वी जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडल्या असल्या, तरी मानवी जीवितहानीची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. ग्रामस्थांच्या मते, रात्रीच्या वेळी शेतातून घरी परतताना अथवा बाहेर पडताना सतत धोका जाणवतो.

या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. बिबट्यांचा बंदोबस्त करणे, पिंजरे लावणे, रात्रीच्या वेळी गस्त वाढवणे अशा खबरदारीच्या उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे. वनविभागाने या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून, परिसरात पिंजरे लावण्याचे नियोजन असल्याचे सांगितले आहे. तसेच ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

गणेश गाडगेंच्या निधनाने गावात शोककळा पसरली असून, ग्रामस्थांनी प्रशासनाला त्वरित कारवाई करून बिबट्यांचा धोका कमी करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा प्रारूप प्रभाग रचनेवर ठाकरे शिवसेना हरकती घेणार : शहरप्रमुख काळे

इच्छुकांची चाचपणी सुरू, आघाडी बाबत योग्य वेळी निर्णय घेऊ अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर...

सरकार झुकलं! मागण्या मान्य पण जरांगे पाटलांनी पुन्हा सरकारला दिला ‘हा’ इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - मनोज जरांगे यांच्या मागण्याचा सरकारकडून जीआर काढण्यात आला आहे....

पानटपरीवर गॅंगवार; कोयत्याने सपासप वार! शहरात गुन्हेगारांचा कहर, चाललंय काय?, वाचा सविस्तर..

Ahilyanagar Crime News: पानटपरीवर बसलेल्या युवकावर दहा जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. मित्राचे भांडण...

सबसे हटके गौतमी पाटील झटके! ‘टीप टीप बरसा पाणी’ वर स्विमिंग पूलमध्ये डान्स, पहा व्हायरल व्हिडीओ..

मुंबई | नगर सहयाद्री लोकप्रिय लावणी कलाकार आणि सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील पुन्हा...