spot_img
देश२२ नक्षलवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाची मोठी कारवाई

२२ नक्षलवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाची मोठी कारवाई

spot_img

Naxalite encounter : छत्तीसगडमधील बिजापूर आणि कांकेरमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई केली. सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत एकूण २२ नक्षलवादी ठार झाले. बिजापूर-दंतेवाडा सीमेवरील गंगलूर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या जंगलात झालेल्या चकमकीत १८ नक्षलवादी ठार झाल्याचे बिजापूर पोलिसांनी सांगितले. तर कांकेरमध्ये चार नक्षलवादी मारले गेले. मात्र, यामध्ये एक सैनिकही शहीद झाला. बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी याची पुष्टी केली आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, कारवाईदरम्यान, गुरुवारी सकाळी ७ वाजल्यापासून नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू होता. ही चकमक विजापूरच्या गंगलूर भागातील आंद्रीच्या जंगलात घडली. एसपी जितेंद्र यादव म्हणाले की, चकमक अजूनही सुरू आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा दलांचे संयुक्त पथक गंगलूर पोलिस स्टेशन परिसरात नक्षलविरोधी कारवाईवर असताना ही चकमक सुरू झाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, परिसरात अजूनही अधूनमधून गोळीबार सुरू आहे. या संदर्भात अधिक माहिती गोळा केली जात आहे.

खरं तर, डीआरजी, एसटीएफ आणि सीआरपीएफची संयुक्त टीम बिजापूर आणि दंतेवाडा सीमावर्ती भागातील गंगलोर पोलिस स्टेशन अंतर्गत नक्षलविरोधी कारवाईसाठी निघाली होती. या कारवाईदरम्यान, गुरुवारी सकाळी माओवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू होता, त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू असताना, चकमकीच्या ठिकाणी दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. या चकमकीत विजापूर डीआरजीचा एक जवानही शहीद झाला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...