spot_img
देश२२ नक्षलवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाची मोठी कारवाई

२२ नक्षलवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाची मोठी कारवाई

spot_img

Naxalite encounter : छत्तीसगडमधील बिजापूर आणि कांकेरमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई केली. सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत एकूण २२ नक्षलवादी ठार झाले. बिजापूर-दंतेवाडा सीमेवरील गंगलूर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या जंगलात झालेल्या चकमकीत १८ नक्षलवादी ठार झाल्याचे बिजापूर पोलिसांनी सांगितले. तर कांकेरमध्ये चार नक्षलवादी मारले गेले. मात्र, यामध्ये एक सैनिकही शहीद झाला. बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी याची पुष्टी केली आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, कारवाईदरम्यान, गुरुवारी सकाळी ७ वाजल्यापासून नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू होता. ही चकमक विजापूरच्या गंगलूर भागातील आंद्रीच्या जंगलात घडली. एसपी जितेंद्र यादव म्हणाले की, चकमक अजूनही सुरू आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा दलांचे संयुक्त पथक गंगलूर पोलिस स्टेशन परिसरात नक्षलविरोधी कारवाईवर असताना ही चकमक सुरू झाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, परिसरात अजूनही अधूनमधून गोळीबार सुरू आहे. या संदर्भात अधिक माहिती गोळा केली जात आहे.

खरं तर, डीआरजी, एसटीएफ आणि सीआरपीएफची संयुक्त टीम बिजापूर आणि दंतेवाडा सीमावर्ती भागातील गंगलोर पोलिस स्टेशन अंतर्गत नक्षलविरोधी कारवाईसाठी निघाली होती. या कारवाईदरम्यान, गुरुवारी सकाळी माओवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू होता, त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू असताना, चकमकीच्या ठिकाणी दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. या चकमकीत विजापूर डीआरजीचा एक जवानही शहीद झाला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राज ठाकरेंच्या घातपाताचा प्लॅन: ‘बड्या’ नेत्याचा खळबळजनक आरोप

मुंबई। नगर सहयाद्री: महाराष्ट्राच्या राजकारणात आता राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच...

आमदार काशीनाथ दाते यांच्या प्रयत्नांना यश; पारनेरची जलक्रांती निर्णायक वळणावर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुयातील जलसंपत्ती विकासाला चालना देण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी गेल्या...

अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी दुर्घटना! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कुल बस घाटात पलटली; ३५ विद्यार्थी…

संगमनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुयात शाळेच्या बसला अपघात झाला आहे. पुणे...

सुसाट टेम्पोने उडविल्या १० दुचाकी, अहिल्यानगर शहरातील दुर्घटना कशी घडली?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका टेम्पोने चारचाकीसह ८ ते १०...