spot_img
देशकाँग्रेसला पुन्हा झटका! लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बजावली १७०० कोटींची नोटीस, नेमकं प्रकरण...

काँग्रेसला पुन्हा झटका! लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बजावली १७०० कोटींची नोटीस, नेमकं प्रकरण काय?

spot_img

Income Tax Notice: ऐन लोकसभा निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसला पुन्हा झटका बसला आहे. आयकर विभागाने काँग्रेसला तब्बल १७०० कोटी रुपयांची नवी नोटीस बजावली आहे. २०१७-१८ ते २०२०-२१ पर्यंतच्या कालावधीतील पेनल्टी व व्याजाची थकीत रक्कम भरण्यासाठी आयकर विभागाने ही नोटीस पाठवली आहे.

यापूर्वी देखील आयकर विभागाने काँग्रेसला नोटीस पाठवली होती. थकीत रक्कम न भरल्यामुळे आयकर विभागाने काँग्रेसला दंडही ठोठावला होता. यासोबत काँग्रेसची बँक खाते देखील गोठवण्यात आली होती. आयकर विभागाच्या या कारवाईविरोधात काँग्रेसने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.मात्र, या प्रकरणावर सुनावणी घेताना उच्च न्यायालयाने काँग्रेसला दिलासा देण्यास नकार दिला. न्यायमूर्ती यशवंत वर्मा आणि न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांच्या खंडपीठाने काँग्रेस पक्षाची याचिका फेटाळून लावली.

उच्च न्यायालयाने याचिका फेटाळताच आयकर विभागाने काँग्रेसला नवीन नोटीस बजावली आहे.२०१७-१८ ते २०२०-२१ पर्यंतच्या कालावधीतील पेनल्टी व व्याजाची थकीत रक्कम भरण्याचे आयकर विभागाने सांगितले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला दुहेरी झटका बसला असून अडचणीत वाढ झाली आहे.दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांची गळचेपी केली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांवर अशा प्रकारे कारवाया करणे लोकशाहीसाठी घातक असल्याचं काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि वकील विवेक तन्खा यांनी म्हटलं आहे. तर काँग्रेस पक्ष आयकर विभागाच्या या नोटीसीला कायदेशीर मार्गाने उत्तर देईल आणि पाठपुरावा करेल, असं तन्खा यांनी स्पष्ट केलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...