spot_img
ब्रेकिंगबारावीच्या विद्यार्थ्यांची गाडी पलटली; कुठे घडला अपघात?

बारावीच्या विद्यार्थ्यांची गाडी पलटली; कुठे घडला अपघात?

spot_img

छ. संभाजीनगर | नगर सह्याद्री
छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात 12वी बोर्डाच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे . वैजापूरच्या खंडाळ्याजवळ गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाल्याने मोठा अपघात झाला असून 5 विद्याथ जखमी झाले आहेत. या पाच विद्यार्थ्यांपैकी एक तरुण गंभीर जखमी असून इतर चारही जखमी विद्याथ बोर्डाच्या पेपरसाठी हजर राहिले. जखमी तरुणाला तातडीने वैजापूरचा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा राज्यभरात आजपासून (11 फेब्रुवारी) सुरू झाली. सकाळी 11 वाजता राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर बारावी बोर्डाच्या पहिल्या पेपरला सुरुवात झाली .दरम्यान छत्रपती संभाजी नगरच्या वैजापूर तालुक्यात परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीचा अपघात झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

बारावी बोर्डाच्या परीक्षेला घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीचा छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरजवळ अपघात झाला .गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली .सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही मात्र 5 विद्याथ जखमी झाले . या विद्यार्थ्यांमध्ये एकाची प्रकृती गंभीर असून इतर चार जणांना किरकोळ दुखापत झाली आहे . जखमी तरुणाला वैजापूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . सुदैवाने इतर चार विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली.

अपघातानंतर किरकोळ दुखापत झालेल्या चार विद्याथ बोर्डाच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांवर पोहोचले . बारावी परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. संपूर्ण वर्षभर कष्ट घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा दिवस निर्णायक असतो. मात्र, खंडाळा गावातील या 5 विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रापर्यंतचा प्रवास अत्यंत धोकादायक ठरला. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती पलटी झाली आणि विद्याथ जखमी झाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सणाला गालबोट! दोन गटात राडा; वाद सोडवणे पोलिसाला भोवले

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - बिहारच्या मुंगेरमध्ये दोन गटाचा वाद सोडवायला गेलेल्या सहायक पोलीस...

१ एप्रिलपासून FASTag अनिवार्य; अन्यथा दुप्पट टोल भरावा लागणार, काय आहेत नियम

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्र शासनाने फास्टॅगसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.आता १ एप्रिलपासून प्रत्येक...

कृषिमंत्री कोकाटे यांच्या अडचणीत वाढ! हायकोर्टात याचिका..

Manikrao Kokate: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोकाटे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात...

शिवसेना खंबीरपणे गोरक्षकांच्या पाठीशी: काळे

माजी मंत्री अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त सावेडीतील सतनाम साक्षी गोशाळेत चारावाटप अहिल्यानगर । नगर...