spot_img
अहमदनगरAhmednagar politics News: घनकचरा व्यवस्थापन कर रद्द करा, कोणी केली मागणी? पहा..

Ahmednagar politics News: घनकचरा व्यवस्थापन कर रद्द करा, कोणी केली मागणी? पहा..

spot_img

नगर। नगर सहयाद्री
घनकचरा व्यवस्थापन कर रद्द करण्यात यावा व सर्वसाधारण मालमत्ता करांमध्ये जून पर्यंत १० टक्के सूट मिळावी, या मागणीचे निवेदन प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांनी मनपा आयुक्तांना देऊन चर्चा केली. याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, संजय शेंडगे, गिरिष जाधव, योगिराज गाडे, संतोष गेनप्पा, सचिन शिंदे, परेश लोखंडे, अशोक दहिफळे, गौरव ढोणे, संजय आव्हाड, पप्पू भाले, विशाल वालकर, प्रशांत पाटील, सुरेश क्षीरसागर आदि उपस्थित होते.

मनपाने चालु वर्षाच्या घरपट्टी बीलांमध्ये अवाजवी वाढीव घनकचरा व्यवस्थापन कर दुपटीने वाढविण्यात आला असून, निवासी वापरासाठी पूर्वी २४० रु. होता तो आता ४८० करण्यात आला आहे. तसेच व्यावसायिकांसाठी हा कर पूर्वी १२०० रु. होता तो आता २४०० रुपये करण्यात आला आहे. ही वाढीव कर आकारणी सर्वसामान्य, व्यापारी व दुकानदार यांना न परवडणारी व अन्यायकारक आहे. ती त्वरीत रद्द करावी व पुर्वीप्रमाणे कर आकारणी करावी.

शहरातील छोटे दुकानदार व मोठे व्यापारी यांना घनकचरा व्यवस्थापन कर सरसकट एकसारखा आकारण्यात आल्यामुळे छोट्या व्यावसायिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. तसेच कमी जागेत रहात असलेल्या रहिवासी व मोठ्या जागेत रहात असलेले रहिवासी यांना सुद्धा सरसकट एकसारखा कर आकारण्यात आला आहे. त्यामुळे गरीब जनतेत चिड निर्माण झाली आहे.

यावर्षी एप्रिल व मे मध्ये लोकसभेच्या निवडणुका तसेच कडकडीत उन्हाळ तसेच जून महिन्यात सर्वसामान्य नागरिकांना शैक्षणिक खर्चाची वैयक्तिक तरतुद करावी लागत असल्याने सर्वसाधारण मालमत्ता करामध्ये १० टक्के सूट देण्यात यावी व वाढीव घनकचरा कर रद्द करण्यात यावा, अन्यथा नागरिकांसमवेत जनआंदोलन करण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे यांनी विविध विषयावर चर्चा केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...