spot_img
देश१३ राज्यांत पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

१३ राज्यांत पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री :
देशातील हवामानात काही दिवसापासून चढ-उतार होताना दिसत आहे. त्यातच आता हवामान विभागाने देशाती तब्बल 13 राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. ओडिशामध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जोरदार वारा आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांत पिकांचेही नुकसान होऊ शकते. त्यामुळे राज्य सरकारने 25 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे.

दिल्ली, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीरमध्ये हलका पाऊस झाला. जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागातही जोरदार हिमवृष्टी झाली.

‘या’ राज्यांमध्ये पावसाचा इशारा
जम्मू आणि काश्मीर, हिमाचल, लडाख, उत्तराखंड, सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, मेघालय, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद करण्यात आला
काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सुमारे 300 वाहने अडकून पडली. नचिलाना, शेरबीबी आणि बनिहाल-काझीगुंड चौपदरी बोगद्यात अडकलेल्या वाहनांची सुटका करण्यात येत आहे. महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

राजस्थानमध्ये 5 दिवसांनी उष्णतेची तीव्रता वाढणार
दरम्यान, राजस्थानमध्ये वादळ आणि पाऊस थांबल्यानंतर तापमानात घट झाल्याने थंडी पुन्हा एकदा वाढली आहे. 22 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा हवामानात बदल होणार असून तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. 25-26 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील अनेक शहरांमध्ये दिवसा उष्मा वाढू शकतो. बाडमेर आणि जालोर भागात पारा 35 अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ शकतो. हवामानातील या चढउतारांमुळे राज्यात हंगामी आजारांचे प्रमाणही वाढू लागले आहे.

पावसानंतर पुन्हा थंडी वाढली
गेल्या 24 तासांत राजस्थानमध्ये हवामान स्वच्छ होते आणि गुरुवारी सर्व जिल्ह्यांमध्ये सूर्यप्रकाश होता. वातावरणातील आर्द्रता आणि हलके वारे यामुळे दिवस थोडा थंड राहिला. गुरुवारी अजमेर, अलवर, जयपूर, पिलानी, सीकर, जैसलमेर, फलोदी, बिकानेर, चुरू, नागौर, गंगानगर, बारन, हनुमानगड, सिरोही आणि करौली येथे कमाल दिवसाचे तापमान ३० अंश सेल्सिअस नोंदवले गेले. गुरुवारी चित्तोडगडमध्ये सर्वाधिक तापमान 34.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

अमृतसरमध्ये 36 मिमी पाऊस
पंजाबमध्ये गेल्या 24 तासांत झालेल्या पावसानंतर तापमानात घट झाली आहे. हवामान केंद्राच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत सरासरी कमाल तापमानात 4.7 अंश सेल्सिअसची घसरण नोंदवण्यात आली आहे. मात्र, राज्यात ते सामान्यपेक्षा 1.8 अंश सेल्सिअस कमी आहे. राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान भटिंडा येथे 25.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. गेल्या 24 तासांत पंजाबमधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. अमृतसरमध्ये 36 मिमी, लुधियानामध्ये 6, पटियालामध्ये 9, फरीदकोटमध्ये 11, होशियारपूरमध्ये 15.5, एसबीएस नगरमध्ये 5.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याकडून आज कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. त्यानंतर आज तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सेना-भाजपमध्ये पहिली ठणगी पडली; निवडणुकीपूर्वीच काय घडलं पहा…

मुंबई / नगर सह्याद्री स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच मोठ्या घडामोडी घडायला सुरुवात झाले आहे....

‘मेंथा’चं रौद्र रूप, चक्रीवादळामुळे रेड अलर्ट, महाराष्ट्र सतर्क, IMD ने काय दिला अलर्ट

मुंबई / नगर सह्याद्री : आंध्र प्रदेशच्या किनारी भागाला धडकणाऱ्या मोंथा चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर...

बापरे! एक कोटींचे सोने लांबविले, सराफ बाजारात खळबळ; काय घडलं पहा

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगरच्या प्रसिद्ध सराफ बाजारात अनेक वर्षांपासून विश्वास संपादन करून...

सावधान! महाराष्ट्रावर दुहेरी चक्रीवादळाचं सावट! पुढील काही दिवस पावसाचे, IMD इशारा..

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्रावर दुहेरी चक्रीवादळाचं संकट आलं आहे. बंगालच्या उपसागरातील ‘मोंथा’ आणि...