spot_img
अहमदनगरसुपा एमआयडीसी स्थानिकांना रोजगार द्या; पळवे खु. ग्रामस्थांची मागणी

सुपा एमआयडीसी स्थानिकांना रोजगार द्या; पळवे खु. ग्रामस्थांची मागणी

spot_img

सुपा एमआयडीसी स्थानिकांना रोजगार द्या; पळवे खु. ग्रामस्थांची मागणी

तीन दिवसापासून करत आहे धरणे आंदोलन

आंदोलन तीव्र करण्याचा दिला इशारा

पारनेर/प्रतिनिधी :
सुपा एमआयडीसी मधील कंपन्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार दिला जात नाही या संदर्भात एकता ग्रुप व पळवे खु. येथील ग्रामस्थ गेल्या तीन दिवसापासून धरणे आंदोलन करत आहेत.
त्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की स्थानिक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी हक्काच्या नोकऱ्या मिळाव्यात, स्थानिकांना कामांमध्ये ८० % टक्के कायमस्वरूपी प्राधान्य मिळावे, बाहेरील ठेकेदारा ऐवजी भूमिपुत्रांना प्राधान्य द्यावे.
या मागण्या घेऊन धरणे आंदोलन सुरू होते. या संदर्भातील निवेदन सुद्धा देण्यात आले आहे. तरी कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आता आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
या आंदोलनाला पारनेर नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष विजू औटी यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
यावेळी निशांत तरटे, संतोष तरटे, विनोद जाधव, सागर शेळके, संदीप गाडीलकर, सुहास शेलार, सुनिता तरटे, रावसाहेब जाधव, रोहन शेळके, बापू तरटे, गोरख जाधव, वैभव जाधव, अनिल गायकवाड, भाग्येश देशमुख, अनिल तरटे, लक्ष्मीबाई लंबाळे, संतोष दंडवते, दीपक साळवे, सोपान पवार, विकास पवार, दत्ता माळी, भाऊ घालमे, मयूर तिकोळे, आदी उपोषण स्थळी उपस्थित होते.
या उपोषणाला सुपा परिसरातील व तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. गेल्या अनेक दिवसापासून कंपनी व्यवस्थापन स्थानिकांना रोजगारच देत नसल्या ने आंदोलनाचे हत्यार पळवे खु. येथील ग्रामस्थांना उपसण्याची वेळ आली आहे.

 

पळवे खु. येथील ग्रामस्थ गेल्या तीन दिवसापासून स्थानिक भूमिपुत्रांना सुपा एमआयडीसी मधील कंपन्यांमध्ये रोजगार मिळावा या संदर्भात आंदोलन व उपोषण करत आहेत त्यांच्या या आंदोलनाला मी पाठिंबा देत असून त्यांच्या सोबत आहे.

विजय औटी
(मा. नगराध्यक्ष, पारनेर)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...