spot_img
महाराष्ट्रसरपंच देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मिक कराडच 'मास्टरमाइंड'; न्यायालयात आज काय घडलं?

सरपंच देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मिक कराडच ‘मास्टरमाइंड’; न्यायालयात आज काय घडलं?

spot_img

मुंबई | नगर सहयाद्री-
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या नियोजित कटाचा भाग होती आणि त्यामागे वाल्मिक कराडचं मास्टरमाइंड म्हणून प्रमुख योगदान होतं, असा ठपका विशेष मकोका न्यायालयाने आपल्या निर्णयात ठेवला आहे. कराड याने दोषमुक्ती मिळावी म्हणून बीड जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, गंभीर पुरावे आणि साक्षींच्या आधारे न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला.

विशेष न्यायालयाने नमूद केलं आहे की, वाल्मिक कराड हा एक सक्रिय गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे. गेल्या १० वर्षांमध्ये सात गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे, तर ११ फौजदारी प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. एकूण गुन्ह्यांची संख्या २० पेक्षा अधिक, ज्यात खंडणी, धमकी, मारहाण, जबरदस्ती यांचा समावेश आहे.

संतोष देशमुख यांचा खून एका सुनियोजित कटाअंतर्गतच झाला, कारण ते गुन्हेगारी टोळीच्या खंडणी मार्गात अडथळा ठरत होते. त्यांचे अपहरण करून, नंतर हत्या करण्यात आली. या गुन्ह्यात वाल्मिक कराडची भूमिका मध्यवर्ती होती, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. कराडविरोधात डिजिटल पुरावे, गोपनीय जबाब, फॉरेन्सिक अहवाल आणि थेट साक्षीदारांचे जबाब न्यायालयाने ग्राह्य धरले. या आधारे त्याच्याविरुद्ध सबळ व ठोस पुरावे उपलब्ध असल्याने दोषमुक्ती अर्ज फेटाळण्यात आला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बॉम्बस्फोट नक्की कोणी घडवला?; सरकारला उत्तर द्यावेच लागणार…

विशेष संपादकीय । शिवाजी शिर्के:- मुंबईतील साखळी बाँब स्फोटातील सर्व आरोपींना निर्दोष सोडल्यानंतर राज्य आणि...

नगर तालुका क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी ‘महेंद्र हिंगे’

उपाध्यक्षपदी दीपक दरेकर, भगवान मते, नाना डोंगरे तर सचिवपदी हंबर्डे अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर तालुका...

तारकपूरला चोरट्यांचा डल्ला; दीड लाखाचा मुद्देमाल लंपास

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- तारकपूर परिसरात चोरट्यांनी घरात डल्ला मारुन तब्बल दीड लाखांचा मुद्देमाल लांबविला...

पारनेर तालुक्यातील ‌’या‌’ ५४ गावांचा डोंगरी विभागात समावेश!

सुपा । नगर सहयाद्री:- राज्य सरकारने जाहीर केलेल्या सुधारित यादीनुसार पारनेर तालुक्यातील 54 गावांचा...