spot_img
महाराष्ट्रमहाराष्ट्र गारठला! धुक्याचा साम्राज्य? 'या' जिल्ह्यातील नागरिकांना हुडहुडीचा सामना करावाच लागणार

महाराष्ट्र गारठला! धुक्याचा साम्राज्य? ‘या’ जिल्ह्यातील नागरिकांना हुडहुडीचा सामना करावाच लागणार

spot_img

Maharashtra Weather Update: राज्यात तापमानाचा पारा घसरला असून थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. त्यामुळे नागरिक गारठले असून अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवलेल्या दिसत आहेत. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी लोक जाड कपडे, स्वेटर आणि कान टोपी घालून बाहेर पडताना दिसत आहेत. उत्तर भारतामधून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील तापमान कमी झाले असून दाट धुक्याचा साम्राज्यही काही जिल्ह्यांमध्ये पसरला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या जोरामुळे राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. पुढील दोन दिवसांमध्ये मुंबई, पुणे आणि संपूर्ण राज्यात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

धुळे: सर्वात कमी तापमान नोंदवले
धुळ्यात तापमान पुन्हा एकदा ४.१ अंश डिग्री सेल्सिअसवर घसरले आहे. धुळे जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे, आणि गेल्या आठवड्याभरापासून येथे तापमानात प्रचंड घट होऊ लागली आहे. या थंडीमुळे नागरिकांना शेकोट्यांभोवती बसून उब मिळवावी लागते.

चंद्रपूर: ओसाड थंडी आणि धुके
चंद्रपूर, जे उष्णतेसाठी प्रसिद्ध आहे, सध्या कडक थंडी आणि दाट धुक्याचा सामना करत आहे. तापमान ११ अंश सेल्सिअसवर आले आहे. उन्हाळ्यात ४८ अंश तापमान सहन करणारे चंद्रपूरकर सध्या गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूरकरांना थंडी आणि हुडहुडीचा सामना करावा लागत आहे.

जालना: थंडीची तीव्रता वाढली
जालना जिल्ह्यात देखील थंडीने जोर धरला आहे. जिल्ह्यात तापमान कमी होण्याची शक्यता असून शेकोट्यांभोवती बसून ग्रामीण भागातील लोकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत.

परभणी: यावर्षीची सर्वात कमी तापमान नोंद
परभणी जिल्ह्यात थंडीमुळे तापमानात मोठी घट झाली असून आज ते ४.६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. मागील दिवशी ते ७.८ अंश होते. यंदाच्या हंगामातील हे सर्वात कमी तापमान आहे. हवामान विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

नंदुरबार: सातपुड्याच्या डोंगर रांगेत तापमान ७ अंश
नंदुरबार जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम असून सातपुड्याच्या डोंगर रांगेत तापमान ७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. तोरणमाळ येथे देखील ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. याठिकाणी घोड्यांना उबदार झूल आणि खास खुराक दिला जात आहे, जेणेकरून ते थंडीपासून सुरक्षित राहू शकतील.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....