spot_img
महाराष्ट्रमंत्री कोकाटे केवळ ४२ सेकंद नव्हे, तर तब्बल 'इतका' वेळ पत्ते खेळत...

मंत्री कोकाटे केवळ ४२ सेकंद नव्हे, तर तब्बल ‘इतका’ वेळ पत्ते खेळत होते; रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर विरोधकांकडून आरोपांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आता थेट विधानमंडळ चौकशी अहवालाचा दाखला देत, मंत्री कोकाटे केवळ ४२ सेकंद नव्हे, तर तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळत होते, असा गंभीर आरोप केला आहे. हा अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे सादर करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

याआधी रोहित पवार यांनी कोकाटे यांचा कार्ड खेळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत, “शेतकरी आत्महत्या करत असताना कृषीमंत्री पत्ते खेळत आहेत” असा आरोप केला होता. त्यानंतर कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. आता चौकशी अहवाल पुढे करत रोहित पवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

कृषिमंत्री सभागृहात केवळ ४२ सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळत असल्याचा विधानमंडळाच्या चौकशीचा अहवाल असून हा अहवाल मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे देखील सादर केला असल्याची माहिती देत सरकार याबाबत खुलासा करेल का? सभागृहात तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळणाऱ्या कृषिमंत्र्यावर हे सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्व. अटलजींच्या तर उपमुख्यमंत्री अजितदादांना स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का? असा सवाल पवारांनी उपस्थित केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शनी शिंगणापूर बनावट अ‍ॅप प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर; कोणाच्या खात्यावर पैसे जमा – एसपींनी दिली महत्वाची माहिती

चौकशीतून माहिती उघड | एसपी सोमनाथ घार्गे यांची माहिती अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शनैश्वर देवस्थानशी...

महाभूकंप! ८.७ तीव्रतेच्या भूकंपाने पॅसिफिक महासागर हादरला, त्सुनामीचा धोका

नगर सह्याद्री वेब टीम : रशियाच्या पूर्व किनारपट्टीवर असलेल्या कामचटका द्वीपकल्पाजवळ समुद्राखाली अत्यंत शक्तिशाली भूकंपाची...

शहर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी ‘दीप चव्हाण’

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने दीप...

लाखो नागरिकांचे हाल, केडगावचा पाणीपुरवठा सुरळीत करा; मनोज कोतकर यांची मागणी

अहिल्यानगर | नगर सह्याद्री केडगाव उपनगरातील विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे प्रचंड हात होत आहेत. त्यामुळे...