मुंबई । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. पाच ते सात वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 च्या आतमध्ये महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश आयोगाला दिले.
कोर्टाच्या आदेशानंतर आयोगाकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू कऱण्यात आली. पण निवडणुका लागणार कधी? हा प्रश्न राज्यातील प्रत्येकाच्या डोक्यात घर करून होता. आता याबाबत निवडणुकीची संभाव्य तारीख समोर आली आहे. 10 नोव्हेंबर पर्यंत आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आहे. नगरपालिका निवडणुका डिसेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी पूर्ण होण्याची शक्यता आहे. आयोगाकडून नगरपालिका निवडणुकीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 10 नोव्हेंबर रोजी आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू शकते, असाही एक अंदाज आहे. जर अधिवेशानदरम्यान आचारसंहिता असेल तर सत्ताधाऱ्यांना एकही घोषणा करता येणार नाही. डिसेंबरअखेरपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यामुळे आता राज्यात ऐन हिवाळ्यात राजकीय वातावरण तापणार आहे.
दोन टप्प्यात निवडणुका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल महाराष्ट्रात लवकरच वाजणार आहे. आयोगाकडून संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन टप्प्यात या निवडणुका होऊ शकतात. येत्या 10 नोव्हेंबरपूव आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या संदर्भातील अधिसूचना लवकरच जारी केली जाणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात हालचींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका होऊ शकतात. या निवडणुका हिवाळी अधिवेशनाच्या आधी होतील. तर दुसऱ्या टप्प्यात महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ शकतात. नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात लागणार लागण्याची शक्यता आहे. तर डिसेंबर अखेर महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते.



