Terrorist Attack : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतामध्ये संतापाचे वातावरण असतानाच जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये गुरुवारी सकाळी चकमक सुरू होती. यामध्ये चकमकीत भारतीय जवानाला वीरमरण आले आहे.
जम्मू काश्मीरमधील उधमपूर येथे आज सकाळपासूनच दहशतवादी आणि भारतीय लष्करात चमकक सुरू होती. उधमपूरमध्ये काही दहशतवादी दबा धरून बसल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली होती. त्यानंतर भारतीय जवानांकडून सर्च ऑपरेशन हाती घेण्यात आले. दुदू-बसंतगड परिसरात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत एका भारतीय जवानाला वीरमरण आले.
घटनेने संपूर्ण देशात संताप आणि शोक व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वीच पहलगामध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप २८ पर्यटकांचा जीव घेतला आहे. त्यामुळे संतापाची लाट असतानाच पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी डोके वार काढले आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे.