spot_img
ब्रेकिंगParner News: भाजप नेत्यांची मध्यस्थी यशस्वी! सरपंच कारखीले यांचे उपोषण मागे, लोकप्रतिनिधी...

Parner News: भाजप नेत्यांची मध्यस्थी यशस्वी! सरपंच कारखीले यांचे उपोषण मागे, लोकप्रतिनिधी यांच्या ‘त्या’ भुमिकेवर टीका

spot_img

राळेगण थेरपाळ | नगर सह्याद्री-
भाजप नेत्यांची मध्यस्थी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाने सरपंच पंकज कारखीले, म्हसे खुर्द व राळेगण थेरपाळ ग्रामस्थांचे उपोषण मागे घेण्यात आल्याची माहिती राळेगण थेरपाळ व म्हसे खुर्द ग्रामस्थांनी दिली.

म्हसे खुर्द ते राळेगण थेरपाळ हा साडेपाच किलोमीटरचा रस्ता अत्यंत नादुरुस्त झाला असून यामध्ये या रस्त्यासाठी राज्य सरकारने साडेसात कोटी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सरपंच कारखीले व ग्रामस्थांनी केली होती. मुख्यमंत्रीसह संबंधित मंत्र्यांना निवेदन पाठवले होते. तसेच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात यावर निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. निधी उपलब्ध न झाल्यास पारनेर तहसील कार्यालय येथे उपोषणाचा इशारा दिला होता.

मात्र आमदार नीलेश लंके यांनी पक्षपातीपणा केला असून यावर निधी उपलब्ध होण्यासाठी लंके यांनी आडकाठी आणल्याचा आरोप सरपंच कारखिले यांनी करीत सोमवारी (दि. ११) उपोषणाला बसले होते.मंगळवारी (दि. १२) दुपारी भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, सुप्याचे सरपंच दत्ता पवार यांनी सरपंच कारखिले यांच्यासह आंदोलकांना भेटून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र उपोषणावर ठाम असून जो पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

कोरडे व शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना संपर्क करुन पारनेर येथे बोलावून घेतले. यावेळी कार्यकारी अभियंता पालवे, डेप्युटी इंजिनियर तीपोळे, ज्युनिअर इंजिनियर लेंडे यांनी तातडीने आंदोलकांशी चर्चा केली. तसेच हे काम प्राधान्याने घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर सरपंच पंकज कारखीले व ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले. यावेळी सरपंच पंकज कारखीले यांना भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, सुप्याचे सरपंच दत्ता पवार यांच्या हस्ते लिंबू सरबत देऊन उपोषण सोडण्यात आले.

लोकप्रतिनिधीनी भ्रम दूर करावा

तालुक्याचे लोकप्रतिनिधी विकासकामांत कसे राजकारण करतात हे जनतेला माहित आहे. आपण म्हणजे राज्य चालवतो हा त्यांचा भ्रम आहे. लोकप्रतिनिधी जनतेचा सेवक असतो, हा त्यांचा दिखावा आहे. मुखमे राम बगलमे छुरी, ही त्यांची प्रवृत्ती जास्त दिवस चालणार नाही. या उपोषणाला तालुक्यातील सर्व नेत्यांनी समक्ष भेटून पाठिंबा देत पाठबळ दिले त्याबद्दल धन्यवाद. विकास कामे होत राहणार आहेत. शासकीय अधिकारी महत्वपूर्ण असून आपण सत्तेत आहे, म्हणून काहीही करु शकतो हा भ्रम त्यांनी दूर करावा.

– पंकज कारखीले, सरपंच, राळेगण थेरपाळ

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रति पंढरपूर पळशी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध : सुजित झावरे पाटील

आषाढी एकादशी निमित्त आरती व महापूजा; भाविकांची अलोट गर्दी/ पारनेर पोलीस प्रशासनाचा पळशी येथे...

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...