spot_img
ब्रेकिंगParner News: भाजप नेत्यांची मध्यस्थी यशस्वी! सरपंच कारखीले यांचे उपोषण मागे, लोकप्रतिनिधी...

Parner News: भाजप नेत्यांची मध्यस्थी यशस्वी! सरपंच कारखीले यांचे उपोषण मागे, लोकप्रतिनिधी यांच्या ‘त्या’ भुमिकेवर टीका

spot_img

राळेगण थेरपाळ | नगर सह्याद्री-
भाजप नेत्यांची मध्यस्थी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाने सरपंच पंकज कारखीले, म्हसे खुर्द व राळेगण थेरपाळ ग्रामस्थांचे उपोषण मागे घेण्यात आल्याची माहिती राळेगण थेरपाळ व म्हसे खुर्द ग्रामस्थांनी दिली.

म्हसे खुर्द ते राळेगण थेरपाळ हा साडेपाच किलोमीटरचा रस्ता अत्यंत नादुरुस्त झाला असून यामध्ये या रस्त्यासाठी राज्य सरकारने साडेसात कोटी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सरपंच कारखीले व ग्रामस्थांनी केली होती. मुख्यमंत्रीसह संबंधित मंत्र्यांना निवेदन पाठवले होते. तसेच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात यावर निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. निधी उपलब्ध न झाल्यास पारनेर तहसील कार्यालय येथे उपोषणाचा इशारा दिला होता.

मात्र आमदार नीलेश लंके यांनी पक्षपातीपणा केला असून यावर निधी उपलब्ध होण्यासाठी लंके यांनी आडकाठी आणल्याचा आरोप सरपंच कारखिले यांनी करीत सोमवारी (दि. ११) उपोषणाला बसले होते.मंगळवारी (दि. १२) दुपारी भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, सुप्याचे सरपंच दत्ता पवार यांनी सरपंच कारखिले यांच्यासह आंदोलकांना भेटून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र उपोषणावर ठाम असून जो पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

कोरडे व शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना संपर्क करुन पारनेर येथे बोलावून घेतले. यावेळी कार्यकारी अभियंता पालवे, डेप्युटी इंजिनियर तीपोळे, ज्युनिअर इंजिनियर लेंडे यांनी तातडीने आंदोलकांशी चर्चा केली. तसेच हे काम प्राधान्याने घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर सरपंच पंकज कारखीले व ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले. यावेळी सरपंच पंकज कारखीले यांना भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, सुप्याचे सरपंच दत्ता पवार यांच्या हस्ते लिंबू सरबत देऊन उपोषण सोडण्यात आले.

लोकप्रतिनिधीनी भ्रम दूर करावा

तालुक्याचे लोकप्रतिनिधी विकासकामांत कसे राजकारण करतात हे जनतेला माहित आहे. आपण म्हणजे राज्य चालवतो हा त्यांचा भ्रम आहे. लोकप्रतिनिधी जनतेचा सेवक असतो, हा त्यांचा दिखावा आहे. मुखमे राम बगलमे छुरी, ही त्यांची प्रवृत्ती जास्त दिवस चालणार नाही. या उपोषणाला तालुक्यातील सर्व नेत्यांनी समक्ष भेटून पाठिंबा देत पाठबळ दिले त्याबद्दल धन्यवाद. विकास कामे होत राहणार आहेत. शासकीय अधिकारी महत्वपूर्ण असून आपण सत्तेत आहे, म्हणून काहीही करु शकतो हा भ्रम त्यांनी दूर करावा.

– पंकज कारखीले, सरपंच, राळेगण थेरपाळ

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डीवायएसपी बनून प्लॉटच्या नावावर रेल्वे पोलिसांना घातला मोठा गंडा; काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री स्वतःला निलंबित डीवायएसपी असल्याचे भासवून आणि प्लॉटिंग व्यवसायाच्या नावाखाली रेल्वे सुरक्षा...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अतिवृष्टी नुकसानीचे अनुदान खात्यावर वर्ग

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिवृष्टी आणि पूर यामुळे दिनांक ०१ जून ते सप्टेंबर २०२५ या...

मनपाची मनमानी थांबवा, त्यावर नागरिकांचा संताप, खासदार लंके म्हणाले…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर आकारणी प्रक्रियेतील अनियमितता, अस्पष्टता आणि नियमभंगाविरोधात...

मालमत्ताकरात मनपाकडून मोठे स्टेटमेंट; आयुक्त डांगे म्हणाले…

मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत कराच्या नाहीत / कर निर्धारित करण्यासाठी...