spot_img
ब्रेकिंगकाँग्रेसच्या माजी मंत्र्यांचा आरोप : महावितरणच्या प्रीपेड मीटरने ग्राहकांची लूट

काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचा आरोप : महावितरणच्या प्रीपेड मीटरने ग्राहकांची लूट

spot_img

 

अमरावती : नगर सह्याद्री
महाराष्ट्रात सध्या महावितरणच्या वतीने घरोघरी जाऊन प्रीपेड मीटर लावण्याचे काम जोरात सुरू आहे. मात्र, हे मीटर म्हणजे मोबाईल रिचार्ज प्रमाणे ग्राहकांची लूट करणारे आहे. वीज प्रीपेड मीटरमध्ये भविष्यात २८ दिवसांचा प्लॅन असेल. त्या माध्यमातून वर्षाला १२ ऐवजी १३ महिने कंत्राटदार वीज ग्राहकांकडून वसुली करतील, असा खळबळ जनक दावा काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी केला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या महावितरणच्या वतीने प्रीपेड वीज मीटर लावण्याचा धडाका सुरू झालेला आहे. या मीटरचे अनेक फायदे सांगितले जात आहेत. तरी पहिल्याच टप्प्यात मीटर रिडींग घेणारे हजारो हात बेरोजगार होणार असल्याने राज्यभरात आंदोलन सुरू झाले आहे. वीज ग्राहकांना हे मीटर सक्तीचे करू नये यासाठी अनेकांनी न्यायालयाचा दरवाजा सुद्धा ठोठावला आहे.

रिवेम्प्ड डिस्ट्रीब्यूशन सेक्टर स्कीम (आरडीएसएस) अंतर्गत हे प्रीपेड वीज लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या प्रीपेड मीटर चे अनेक धोके असल्याचे तज्ञांचे मत आहे. याबाबत काँग्रेसचे नेते व माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख महाराष्ट्र टाईम सोबत बोलताना म्हणाले की, प्रीपेड वीज मीटर म्हणजे ग्राहकांची शुद्ध लूट आहे. खाजगी कंपन्यांसोबत हात मिळवणी करून सरकारमधले लोक चंदा दो धंदा लो या तत्त्वावर काम करत आहे.

ज्याप्रमाणे मोबाईल कंपन्या २८ दिवसांचा रिचार्ज देतात. त्याचप्रमाणे हे प्रीपेड मीटर सुद्धा भविष्यात काम करणार आहे. वीज मीटर आणि मोबाईल बिलच्या माध्यमातून सरकारने सर्वसामान्यांच्या आयुष्यात दुष्काळात १३ महिने दाखल केला आहे म्हणजे वर्षाला ३६५ दिवस. मात्र, आता २८ दिवसांच्या हिशोबाने १२ महिन्याचे ३३६ दिवस होतील. दरवर्षी २९ दिवसांचे अतिरिक्त पैसे या कंत्राटदार कंपन्या वसूल करतील.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वैष्णवी हगवणेचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टममधून धक्कादायक माहिती समोर

पुणे / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या...

धक्कादायक! मुख्याध्यापिकेनेच शिक्षक पतीला संपवलं, मृतदेह टाकला जाळून, कुठे घडला प्रकार पहा

यवतमाळ / नगर सह्याद्री - महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एक खळबळजनक हत्याकांड उघडकीस आले आहे....

IAS पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट; ‘सर्वोच्च न्यायालयाने जामीन..’

मुंबई । नगर सहयाद्री:- वादग्रस्त ठरलेल्या माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना सर्वोच्च...

नगर जिल्ह्यात खळबळ! बिबट्या अडकला पिंजऱ्यात; एकाच ठिकाणी चार-चार?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार बुद्रुकमध्ये एकापाठोपाठ चार बिबटे जेरबंद करण्यात आले...